Compensation of Rs 23 crore to mango cultivators  
कोकण

व्वा..! 23 कोटी? विमाधारक आंबा बागायतदारांना हा तर मोठा आधार

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनीकडून तब्बल 22 कोटी 94 लाख एवढी नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा बॅंकेला प्राप्त झाली आहे. जिल्हा बॅंकेच्या 4 हजार 306 आंबा पीक विमा उतरलेल्या सभासद शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, अशी माहीती जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. 

प्रधानमंत्री फसल विमा योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतर 5 हजार 334 शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकमार्फत 2 कोटी 72 लाखांचा विमा उतरविला होता. भारतीय कृषी विमा कंपनी मुंबईमार्फत हा विमा उतरविला होता. यातील 4 हजार 306 आंबा शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 94 लाख इतकी विमा रक्कम जिल्हा बॅंकेकडे जमा झाल्याने कोरोना आपत्तीत आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा बॅंक अध्यक्ष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने संबधित विमा कंपनी व शासन स्तरावर केलेल्या पाठपुरव्याला मोठे यश मिळाले आहे. यावर्षी सुद्धा आंबा व काजू बागायतदार यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आपली विमा रक्कम भरून विमा कवच घेण्याचे श्री. सावंत यांनी आवाहन केले आहे. 

प्रधानमंत्री फसल विमा योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील आंबा व काजू पिकासाठी 5 हजार 334 शेतकऱ्यांनी 2 कोटी 72 लाख रुपये रक्कमेचा फळ पीक विमा उतरविला होता. यातील केवळ आंबा पिकाचा विमा उतरविलेल्या 4 हजार 388 शेतकऱ्यांना 22 कोटी 94 लाख रक्कम मंजूर झाली आहे. हे सर्व लाभार्थी जिल्हा बॅंकेचे आहेत. गतवर्षी 2 हजार 723 शेतकऱ्यांना 14 कोटी 32 लाख रुपये विमा रक्कम मिळाली होती. भारतीय कृषि विमा कंपनी मुंबईमार्फत आंबा पिकासाठी हेक्‍टरी 6 हजार 50 रुपये तर काजू पिकासाठी हेक्‍टरी 4 हजार 250 रुपये हवामान आधारित फळ पीक विमा रक्कम दिली जाते. 

वंचितांना लाभ 
जिल्ह्यात 39 महसूल मंडळे आहेत. यातील देवगड तालुक्‍यातील देवगड, मिठबांव, पडेल व मालवण तालुक्‍यातील मालवण, आंबेरी, आचरा ही मंडळे वंचित राहिली होती. यावर्षी मात्र सर्व मंडळाना लाभ मिळाला आहे. जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे, असे सावंत यांनी सांगितले. 

काजुला रुपयाही नाही 
एकीकडे आंबा पीक नुकसानीची भरपाई विमा रक्कमेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली असताना दुसरीकडे याचवेळी खराब हवामानामुळे नुकसान झालेली काजू पिकाला शासनाने विमा कंपनीने एकही रुपया मंजूर केलेला नाही. 2019 मध्ये जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी काजू पिकाचा विमा उतरविलेला होता. त्यामुळे काजू उत्पादक नाराज झाले आहेत. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Padole Nagpur Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

Latest Marathi News Live Update : राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

Murtizapur-Akola News: पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपावर रांगा; भरीत भर सकाळपासून तीन पेट्रोल पंप बंद; साठा येण्यास विलंबामुळे पंप बंदची माहिती

Rahul Gandhi:गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचारात वाढ:राहुल गांधी, भाजप सरकारच्या कार्यकाळात तिरस्कार,भेदभावात वाढ!

SCROLL FOR NEXT