कोकण

सिंधुदुर्ग : कासमध्ये दसरोत्सवावरून वाद

सकाळ वृत्तसेवा

बांदा - देवीची तरंगकाठी व कळस फिरवण्याच्या मानपानावरून कास येथील पंडीत व भाईप यांच्यातील देवस्थानचा असलेला वाद दसरोत्सवात पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सावंतवाडी तहसीलदारांनी विजयादशमी दिवशी गावात लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून पंडीत गटाने दसरोत्सव साजरा केल्याची फिर्याद मडूरा महसुल मंडळ अधिकारी अशोक यशवंत पवार यांनी बांदा पोलीसांत दिली आहे. त्यावरून बांदा पोलीसांत 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बांदा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, कास येथील श्री देवी माऊली व देव रवळनाथ देवस्थानातील तरंगकाठी व कळस फिरविण्यावरून पंडीत व भाईप यांच्यात मानपानावरुन गेली काही वर्षे वाद सुरू आहेत. मागील शिमगोत्सवात हा वाद समोर आला होता. त्या अनुषंगाने भाईप गटाने दिलेल्या अर्जानुसार सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात 27 सप्टेंबरला सुनावणी झाली. यावेळी दसरोत्सव साजरा करण्यात एकमत झाले; मात्र श्री देवी माऊली मंदिर, रवळनाथ मंदिर व गावात कळस फिरविणे या एका मुद्‌द्‌यावर वाद असल्याचे दिसून आले.

त्यानुसार 29 सप्टेंबर ते 8 ऑक्‍टोबर दरम्यान भाईप व पंडीत गटाने गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून दसरोत्सव साजरा करण्याचे आदेश सावंतवाडी तहसिलदारांनी दिले होते.
तरंगकाठी व कळस फिरविण्यास मनाई आदेश दिला होता; मात्र पंडीत गटाने मनाई आदेश धुडकावत तरंगकाठी फिरविल्याचा भाईप गटाचा आरोप होता. याबाबतची फिर्याद मडूरा महसुल मंडळ अधिकारी अशोक पवार यांनी बांदा पोलीसांत दिली आहे.

फिर्यादीनुसार तहसीलदारांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंडीत गटाच्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली आहे. त्यात राजाराम दत्ताराम पंडीत, विश्‍वनाथ सखाराम पंडीत, कृष्णा महादेव पंडीत, मनोहर हरी पंडीत, घनश्‍याम राजाराम पंडीत, विठ्ठल जनार्दन पंडीत, विश्वास भास्कर पंडीत, नकुळ रामचंद्र पंडीत, सुरेश माम पंडीत, सुभाष शांताराम पंडीत, बाबली शिवराम पंडीत, विजय रामकृष्ण पंडीत, वसंत गोविंद पंडीत व सत्यवान बलराम पंडीत यांचा समावेश आहे. चार दिवसांत सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

प्रशासनावर आरोप
प्रशासन नेहमीच गावात दुटप्पी धोरण राबवित असल्याने गावात वाद निर्माण होत आहेत. देवस्थानातील वादाची पूर्ण कल्पना प्रशासनाला आहे. असे असतानाही उत्सवावेळी अटी-शर्थी लादून बंदी आदेश देण्यात येतो. त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात. सरसकट बंदी आदेश द्यावेत, अन्यथा बंदी उठवावी; मात्र प्रशासन दुटप्पी व दबावाखाली वागत असल्याने गावात वाद निर्माण होत असल्याचा आरोप भाईप ग्रामस्थांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT