corona awareness on kokan village
corona awareness on kokan village 
कोकण

कोरोनाला हरवायचं ,आपण जिंकायचं म्हणत मनावर दगड ठेवत कर्तव्यकठोरतेचे येथे केले जाते पालन...

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : मुंबईतून आलेली रक्ताची माणसं भिंतीच्या पलीकडे होम क्कारंन्टाईन करण्यात आली. अंगा खांद्यावर खेळणारी नातवंडे चार भिंतीच्या घरात चिडीचूप बसली. भावनांना आवर घालीत सोशल डिस्टन्सचे नियम पाळत मंडणगड तालुक्यातील अनेक गावांतून स्वतःसह आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाने मानवी जीवनाची नितीमुल्य बदलून टाकल्याची भावना प्रत्येकाच्या मनात येवू लागल्या आहेत.


  मे महिना म्हटलं की मंडणगड तालुक्यात ग्रामीण भागातील शांतता भंग होत गावे गजबजून जातात. सार्वजनिक पूजा, ग्रामदेवतेचे उत्सव, लग्न, हळदी समारंभ, क्रीडा स्पर्धा अशा विविध प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने गावापासून रोजगारासाठी दूर गेलेली कुटुंब एकत्रित येत असतात. मात्र कोरोना महामारीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढू लागल्याने त्याचे सावट गावात सुद्धा पोहचले.

 भिंतीच्या पलीकडे रक्ताची नाती

कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईत स्थलांतरित झालेला तालुक्यातील नागरिक गावात परतू लागला आहे. त्यांना होम कोरोन्टाईन करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी चोख पद्धतीने झाल्यास नागरिकांचे आरोग्य सुरक्षित आणि निरोगी राहू शकणार असल्याने जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अनेक गावांतून गावातील बंद घरे, शाळा, अंगणवाडी, मंदिरे यांचा वापर करून मुंबईतून येणाऱ्या रक्ताची माणसे, नातेवाईक यांना क्कारंन्टाईन करण्यात येत आहे.

आजी आजोबा म्हणत बिलगणारी नातवंडे गप्प राहून आपल्या वडिलांसोबत व्यवस्था केलेल्या घरात शांतपणे शिरत बंदिस्त होत आहेत. कधीही न अनुभवलेल्या या घटनेने ग्रामस्थांची व मुंबईकरांची मने काही क्षणासाठी हेलावली जात आहेत. मात्र कोरोनाला हरवायचं आणि आपण जिंकायचं यामुळे मनावर कर्तव्य कठोरतेचा दगड ठेवत नियमांची पाळवणूक करताना ग्रामस्थ व मुंबईकर दिसून येत आहेत. मुंबईकरांची जेवण, पाणी व मूलभूत सुविधांची व्यवस्था करताना त्यांची विशेष काळजी घेतली जात आहेत.

कोकणवासीयांची कोरोनामुळे कसोटीची परीक्षा
 कोकणातील मानवी जीवन सध्या अशा एका वळणावर आले आहे की, त्यातून स्वतःचा मार्ग स्वतःला निवडावा लागेल. प्रथम रोजगारासाठी स्थलांतरित झालेला कोकणवासीय आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा स्थलांतरित होत आहे. यात त्याची अक्षम्य परवड होत असून त्यामुळे कोकणवासीयांची मने विविध विचारांनी उद्विग्न झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुभवलेला मनस्ताप, शेकडों किमीची पायपीट, रोखणाऱ्या विविध नजरा आणि मिळणारी वागणूक यामुळे ही मानवी मने अजूनतरी तरली असून कोकणातील नागरिकांना आपली मने घट्ट करावी लागणार आहेत.

मनावर दगड ठेवत कर्तव्यकठोरतेचे पालन

शासन, प्रशासनाविरुद्ध निर्माण झालेली चीड विविध मार्गाने संतापाद्वारे व्यक्त होवू लागली आहे. आपल्याच माणसांकडून मिळणारी अनपेक्षित विचारांची वागणूक काही ठिकाणी मनोबल उंचावणारी तर काही वेळेला खच्चीकरण करणारी ठरत आहे. मागील वीस वर्षांत कोकणातून मोठा वर्ग रोजगार, शिक्षण यासाठी मुंबई सारख्या मेट्रोशहरात स्थलांतरित झाला. यात मंडणगड, दापोली तालुक्यातील नागरिकांचा समावेश हा अन्य तालुक्यातील संख्येच्या मानाने जास्त आहे. कुटुंबाच्या कुटुंब स्थलांतरित झाल्याने गावे ओस पडली. शेकडों घरे कुलूप बंद झाली. याला जबाबदार कोण यावर मतमतांतरे असून राजकीय इच्छाशक्ती पूर्णतः कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. तर स्थानिकांची मानसिकता नसल्याची ओरड होत आहे. मात्र वास्तव समोर असून त्याला सामोरे जात असताना सामान्य नागरिकांची फरपट होते हे नक्की.

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT