Demand Of Loan For Purchase Of Cashw Mango  
कोकण

काजू - आंबा खरेदीसासाठी  बिनव्याजी अर्थसहाय्य देण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - राज्याच्या विकासामध्ये सहकार चळवळीचे मोठे योग्यदान आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व तालुका शेतकरी खरेदी - विक्री संघांनी शेतकऱ्यांकडून थेट काजू - आंबा बाजारभावाने खरेदी करावा, या कामी दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बॅंकांनी या संघांना बिनव्याजी अर्थसहाय्य करावे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोहन केळुसकर यांनी केली आहे. 

माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर येथील विनाशकारी पेट्रोकेमिकल रिफायनरीची तळी उचलताना या कंपनीच्या माध्यमातून आंबा खरेदी करावी, अशी पेर्टोलियन मंत्र्यांकडे केलेली मागणी हास्यास्पद आहे. जगामध्ये कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजवला असताना आणि त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना अशा वेळी एखाद्या विनाशकारी प्रकल्पाची तळी उचलणे म्हणजे समस्त नागरिकांचा अपमान आहे. अशा दलालांना रोखण्याची ताकद आम आदमीच्या मनगटात आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

तालुका खरेदी - विक्री सहकारी संघ हे शेतकरी - बागायतदार यांच्याकडील उत्पादीत मालांच्या खरेदीसाठी स्थापन झाले आहेत. कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील हे संघ ही भुमिका निभावतात. हीच भुमिका कोकणातील या संघांनी उचलावी, असे श्री. केळुसकर यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, "" कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांनी काजुचे दर पाडले आहेत. ते शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत आहेत. हापुस आंबा तर नाशिवंत आहे. अशा परिस्थितीत या संघांनी शेतकरी बागायतदारांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याकडून योग्य भावाने आंबा खरेदी करून ग्राहकांना माफक दरात विकावा. या संघांना जिल्हा बॅंकांनी अर्थसहाय्य करावे.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT