karpa
karpa 
कोकण

रायगड - करपा रोगमुळे भाताचे पिक जळाले 

लक्ष्मण डूबे

रसायनी (रायगड) : रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा येथील शेतकऱ्यांच्या निसवलेल्या उन्हाळी भात पिकावर करपा रोग पडल्याने पिक जळुन गेले आहे. हाता तोंडात आलेला घास वाया गेल्याने  चिंतातुर झालेले शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. 

मोहोपाडा येथील वामन दळवी, अनंत मुंढे, महेंद्र धुरव आदी शेतकऱ्याच्या शेतातील ऊन्हाळी निसवलेल्या पिकावर करपा रोग पडल्याने उभ पिक जळुन गेले आहे. या वर्षी खराब हवामानामुळे लवकर पिकावर रोग पडला आहे. असे सांगण्यात आले. 

सुरवातीला दोन शेतकऱ्याच्या शेतात करपा  रोग पडला होता. रोगाचा नायनाट करण्यासाठी रासायनिक खतात किटक नाशक औषध मिसळुन टाकली आणि फवारणी सुध्दा केली. मात्र उपयोग झाला नाही रोगाचा फैलाव वाढत गेला. आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या पिकावर रोग पडला असल्याचे अनंत मुंढे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले. येथील शेतकऱ्याचे सुमारे एेंशी टक्के पिक करपा रोगमुळे जळुन गेले आहे. दरम्यान पिक वाया गेले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. तर बियाणे खराब असल्यामुळे रोग पडला आसावा आशी शक्यता जागृत शेतकऱ्यांनी  व्यक्त केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT