governtment order fishing ban period but fisherman took advantages nature environment
governtment order fishing ban period but fisherman took advantages nature environment  
कोकण

मिरकरवाडात शुकशुकाट : शासकीय मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी निसर्गाने दिली साथ मात्र...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शासनाच्या आदेशानुसार मच्छीमारी बंदी कालावधी संपुष्टात आल्यावर पोषक वातावरणाचा फायदा काही मच्छीमारांनी घेतला. स्थानिक खलाशी आणि उपलब्ध असलेले मच्छीमार समुद्रात रवाना झाले. मात्र, वातावरणाचा काही नेम नाही, या भीतीने गिलनेटने मासेमारी करणारे मच्छीमार 15 गावात जाऊन मासेमारी करण्याच्या मानसिकतेत नव्हते. या मुहूर्ताला बांगडा, चिंगुळ, सौदाळा अशी मासळी त्यांच्या जाळ्यात सापडली. 


शासनाने 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मासेमारीवर बंदी घातली होती. हा हंगाम पावसाळी आणि माशांचा प्रजनन काळ असल्याने मच्छीमारही मासेमारीला जात नाहीत. बंदी कालावधी संपुष्टात आला असून, शनिवारी मुहूर्त साधण्याचा काहींचा मानस होता. ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात होते. पर्ससिननेटद्वारे मासेमारीला 1 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. मागील हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनामुळे मच्छीमारी हंगामाला फटका बसला होता. सुमारे दीड महिना मासेमारी बंद होती. शिथिलता मिळाल्यावर मासेमारीला सुरवात झाली असली तरीही निर्यातीसह परराज्यांत मासे पाठविणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या दरावरच त्यांना अवलंबून राहावे लागले. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला.

जून, जुलैमध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मत्स्य हंगाम अडचणीत आला आहे. ट्रॉलिंग मासेमारीसाठी बहुतांश मच्छीमार परराज्यांतील खलाशी बोलावतात. बंदी सुरू होण्यापूर्वी ते खलाशी गावी परतले. त्यांना परत आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बहुतांश मच्छीमारांची समुद्रात जायची तयारी झालेली नाही. त्यामुळे सर्वांत मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे शुकशुकाट होता.

हेही वाचा - हायवे ठेकेदारासह देखरेख कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव देणार... कणकवलीवासियांना कुणी केले आश्वस्त... वाचा


शासकीय मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी निसर्गानेही साथ दिलेली आहे; परंतु ईदमुळे मोजक्‍याच लोकांच्या नौका समुद्रात सोडल्या आहेत. यातही ट्रॉलिंग करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असून, गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांचा टक्‍का अधिक आहे. वरवडे येथील छोटे मच्छीमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते. त्यांना कोळंबी, बांगडा, सौदाळा यासारखी मासळी मिळाल्याचे समजते. 

संपादन ः स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT