कोकण

बाबासाहेबांचे चरित्र लिहिणारा खरवते गावचा सुपुत्र

सकाळवृत्तसेवा

राजापूर - तालुक्‍यातील खरवते गावचे सुपुुत्र तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी डॉ. आंबेडकर यांचे पहिले चरित्र मराठीत लिहून त्यांचे पहिले चरित्रकार बनण्याचा मान मिळवला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी त्यांनी १९४३ मध्ये हे चरित्र लेखन केले. त्याचे पुनर्मुद्रण झाले आहे. 

देश स्वतंत्र होण्यापूर्वी श्री. खरावतेकर या सुपुत्राने कराचीमध्ये वास्तव्यास असताना बाबासाहेबांचे चरित्र लिहिल्याची माहिती जाधव यांना मिळाली. मुंबई विद्यापीठाचे कोकणातील इतिहास विषय घेऊन डॉ. आंबेडकरांनंतरचे पहिले पदवीधर म्हणून खरावतेकर यांची ओळख आहे. अभ्यासपूर्ण लेखन केलेले ‘डॉ. आंबेडकर’ हे पुस्तक त्यावेळी कराची येथून प्रसिद्ध झाले होते. मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरम या व्यासपीठाअंतर्गत ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने पुस्तकाचे पुनर्मुद्रण केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेल्या तानाजी खरावतेकर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर पहिले चरित्र लिहिले असले, तरी त्यांची फारशी माहिती कोणाला नाही. ती साऱ्यांना व्हावी म्हणून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि सफाई कामगार परिवर्तन संघाने गावात मोफत दिली. खरवते गावामध्ये तानाजी खरावतेकर यांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT