kokan people 14 day quarantine August 7 is the deadline ganesha festival 
कोकण

कोकणवासीयांचा सवाल : श्रमिक रेल्वे सेवा सुरू केल्याचे श्रेय घेणारे पुढारी गेले तरी कुठे...?

तुषार सावंत

 कणकवली (सिंधुदुर्ग) : गेल्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात परप्रांतीयांना श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या गावापर्यंत मोफत प्रवास देण्याचे श्रेय अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या पदरात पाडून घेतले.म्हणून आता कोकण रेल्वे सुरू करण्याचा विषय पुढे आला तेव्हा हे पुढारी आहे तरी कुठे असा सवाल कोकणवासी विचारू लागले आहेत ?


गणेशोत्सव साजरा करण्याचा कालावधी कमी दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यातच कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना 14 दिवसाचे विलगीकरण असायला हवे असा दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनाकडे ७ ऑगस्ट ही अखेरची डेडलाईन आहे. त्यानंतर चाकरमानी जरी गावात आले तरी त्यांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता येऊ शकतो का असा प्रश्न पुढे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांची अपेक्षा आहे. ती ही फार मापक आहे. मुंबई पुण्यातून कोकणाकडे येण्यासाठी कोकण रेल्वे हाच पर्याय आहे. श्रमिक रेल्वे सेवा जेव्हा सुरू झाली,  तेव्हा अनेकांनी  त्याचे श्रेय लुटले. परप्रांतीयांना मात्र मोफत प्रवास आणि कोकणवासीयांवर प्रतीक्षेची टांगती तलवार,  ही खंत आता थेटपणे सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागली आहे. 


याचे कारण कोकणातील प्रवाशांना रेल्वेने घेऊन जा, आम्हाला मोफत नको वाजवी दरात विशेष गाड्या सोडा ही मागणी आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंबई-पुणे व इतर भागातून रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी शेकडोंनी निवेदने रेल्वे मंत्रालयाकडे रवाना करण्यात आली आहेत.पण याचा साधा विचारही झाल्याचे दिसत नाही. राज्यातील विशेषत:  कोकणशी संबंधित असलेले बडे नेते शांत झोपत आहेत. अन्यथा आपली आक्रमकता माध्यमांकडे मांडणारी ही मंडळी आता मूग गिळून गप्प का ? कोकणवासीयांचे देणे -घेणे त्यांना राहिले नाही का ? असा सवालही चाकरमानी विचारू लागले आहेत. केंद्र सरकार आणि त्यांचे सगळे नेते राम मंदिराच्या भूमिपूजन   सोहळ्यात गुंतल्याने त्यांना कोकणच्या प्रवाशांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसावा अशी खंतही मुंबईचे चाकरमानी आता व्यक्त करू लागले आहेत.


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT