म्हाप्रळ-आंबेत पुल
म्हाप्रळ-आंबेत पुल sakal
कोकण

कोकण : ११ कोटी फुकट गेल्याची टीका अज्ञानातून

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड: म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या बळकटीकरणाचे नेमके कोणते काम पूर्ण झाले आहे व कोणते काम अद्याप बाकी आहे, याची कोणतीही खातरजमा न करताच अज्ञानाने ११ कोटी रुपये फुकट गेल्याची टीका केली जात आहे. खासदार सुनील तटकरे यांना माहिती न घेता लक्ष्य करण्यात येत आहे. ,राज्यात सध्या तीन पक्षांचे एकत्र सरकार आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तीनही पक्षांची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी केले आहे.

खासदार तटकरे यांच्यावरील टीकेचा समाचार घेताना मुकादम म्हणाले, सावित्री पूल दुर्घटनेनंतर म्हाप्रळ-आंबेत पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले. हा पूल धोकादायक झालेला असल्याचा अहवाल प्राप्त झाला, त्या वेळी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. बांधकाम विभागाने सहा महिन्यांपूर्वी या पुलाचे बळकटीकरणाचे काम पूर्ण केले. पुलाला निधी मंजूर होऊनही काम रखडले होते. दोन वर्ष स्थानिकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या मंडणगड व दापोली तालुक्यांचे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीची मोठी अडचण झाली होती. याकरिता खासदार तटकरे, पर्यटनमंत्री आदिती तटकरे यांनी पाठपुरावा करून पुलाच्या रेंगाळेल्या कामाचा प्रश्न मार्गी लावला. या मार्गावरील वाहतूक खुली केली. या पार्श्वभूमीवर टीकाकारांनी या संदर्भातील खरी माहिती घेऊन मगच लोकप्रतिनिधींना दूषणे द्यावीत.

समजून घेऊनच टीका करावी

गेल्या आठवड्यात पुलाची समस्या गंभीर असल्याचे लक्षात येताच तटकरे यांनी पाहणी करून आवश्यक दुरुस्तीकरिता दहा कोटी रुपयांचा निधी तातडीने मिळवून देण्याचे तसेच या कामात आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टीका करण्यापेक्षा निधी कोण देतो, पूल कोण बांधतो, कामावर नियंत्रण ठेवतो, झालेल्या घटनाक्रमात खरोखरच कोणाची चूक आहे, हे समजून घेऊनच टीका करावी. कोणाचीही बदनामी करण्याचा पवित्रा घेऊ नये, असे मुकादम यांनी सांगितले.

समजून घेऊनच टीका करावी

गेल्या आठवड्यात पुलाची समस्या गंभीर असल्याचे लक्षात येताच तटकरे यांनी पाहणी करून आवश्यक दुरुस्तीकरिता दहा कोटी रुपयांचा निधी तातडीने मिळवून देण्याचे तसेच या कामात आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टीका करण्यापेक्षा निधी कोण देतो, पूल कोण बांधतो, कामावर नियंत्रण ठेवतो, झालेल्या घटनाक्रमात खरोखरच कोणाची चूक आहे, हे समजून घेऊनच टीका करावी. कोणाचीही बदनामी करण्याचा पवित्रा घेऊ नये, असे मुकादम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT