कोकण

आंबा घाटात एकेरी वाहतूक

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून भूस्खलन, दरड कोसळण्यासह जमिनीला भेगा पडण्याचे प्रकार पुढे येत आहेत. चिपळूण, खेड, राजापूर, मंडणगडमधील पूर ओसरला आहे; मात्र रत्नागिरी-कोल्हापूर, कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अद्यापही खंडित आहे. दरम्यान आंबा घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. 

रत्नागिरी तालुक्‍यातील हरचिरी-बौध्दवाडीसह, कोळंबे-वरचीवाडी, तोणदे येथे जमीनीला भेगा पडल्याने सोळा घरांना धोका निर्माण झाला आहे. त्या कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता. 8) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 50.89 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड 70, दापोली 30, खेड 62, गुहागर 44, चिपळूण 106, संगमेश्‍वर 48, रत्नागिरी 10, लांजा 58, राजापूर 30 मिमीची नोंद आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पावसाचा जोर कमी झाला आहे. रत्नागिरी तालुक्‍यात हरचेरी-बौध्दवाडी परिसरात जमिनीला मोठ्या भेगा गेल्या आहेत.

येथील तीन घरांमधील भिंती आणि जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी पंधरा घरे आहेत. या भेगा रुंदावण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि तहसीलदार शशिकांत जाधव यांनी परिस्थितीची पाहणी केली. तेथील नागरिकांची बैठक घेत खबरदारीच्या सूचनाही दिल्या आहे. सुरक्षेसाठी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या; परंतु ग्रामस्थांनी रात्री जवळच्या वाडीत नातेवाईकांकडे राहण्याची तयार दर्शविली आहे. त्याचबरोबर कोळंबे वरचीवाडी आणि तोणदे परिसरातील अशाच मोठ-मोठ्या भेगा गेल्या आहेत. कोळंबेत एका घराला धोका निर्माण झाला आहे. त्यांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणा आली आहे. चिपळूण, मंडणगड, राजापूरातील पाणी ओसरले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे आणि मदत वाटप यावर भर दिला आहे. रत्नागिरी सुरळीत असले तरीही पश्‍चिम महाराष्ट्रातून येणारा भाजीपाला, दूध, इंधनाचा प्रश्‍न गंभीर झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पाटण, साताऱ्यात पाणी असल्यामुळे चिपळूण-कराड मार्ग बंद आहे. मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत आहे.

आंबा घाटात एकेरी वाहतूक

रत्नागिरी-कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटातील रस्ता खचल्याने वाहतुक ठप्प होती. परिस्थितीचा अंदाज घेऊन एकेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र दिवसभरात सोशल मीडियावर आंबा घाटातील रस्ता मोठ्याप्रमाणात खचल्याची चुकीची माहिती प्रसारीत केली जात होती. अशाप्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हरचिरी येथील भेगांची भूगर्भ तज्ञाकडून पाहणी केली जाणार आहे. त्या परिसरातील लोकांना सुरक्षिततेसाठी अन्यत्र राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- शशिकांत जाधव, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT