Mirya-Nagpur National Highway the people who get land four-laning process start in ratnagiri 
कोकण

खातेदारांनो तुमची प्रतिक्षा आता संपली ; एका महिन्यात मिळणार मोबदला

राजेश शेळके

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये जमीन जाणाऱ्या खातेदारांची मोबदला मिळण्याबाबतची प्रतीक्षा तीन वर्षांनी संपली आहे. रत्नागिरी ते आंबा या सुमारे ६९ कि.मी. भागासाठी २७ गावांमधील क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यापैकी रत्नागिरी तालुक्‍यातील साठरे आणि पाली गावातील मोबदला वाटप सुरू होणार आहे. खातेदारांची खाती व इतर माहिती घेण्यासाठी महसूल विभागाने कॅम्पचे आयोजन केले आहे. डिस्टन्सिंगमुळे महिनाभर हे काम चालेल. 

या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ मध्ये सुरू झाली. संगमेश्‍वर तालुक्‍यातील १३ गावांमधील सुमारे १३ लाख ३६ हजार ८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्‍यातील १४ गावांमधील ६ लाख ५२ हजार चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. 
रत्नागिरील ६ आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील १० अशा, एकूण १६ गावांतील जमीन मालकांचा मोबदला निवाडेही फेब्रुवारी २०१९ मध्ये झाले. या निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी झाली. वर्षांनंतर फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्‍यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये प्राप्त झाली. मात्र, कोरोनामुळे निधीवाटप खोळंबले. महसूलने कॅम्प आयोजित करून साठरे येथील १६, पाली बाजारपेठेतील ४९ तर पालीतील ७४ खातेदारांची बॅंक खाती व इतर माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.  

दृष्टिक्षेपात..

-असा मिळणार मोबदला..
-पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा, पानवल ६ -गावांसाठी ६९ कोटी २० लाख
-साठरे गावातील ५९ खातेदारांना ३ कोटी ५९ लाख १२ हजार
-पालीतील ७४ खातेदारांना ४ कोटी ९३ लाख ४१ हजार ७३ रुपये
-पाली बाजारपेठेतील ४९ खातेदारांना ३ कोटी ५६ लाख २ हजार

"सोशल डिस्टन्सिंग असल्याने दिवसाला ५० लोकांची माहिती घेतली जाते. ६० टक्के काम झाले असून महिनाभर ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मोबदला वाटप होईल." 

- डॉ. विकास सूर्यवंशी, प्रांताधिकारी, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: शिवसेना काँग्रेससोबत विलीन होणार का? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देत विषयच संपवला!

Mumbai News: मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! भेसळयुक्त मिठाई-माव्याचा मोठा साठा उघड; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Footpath Rights: फुटपाथवर चालणे हा मूलभूत अधिकार; वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या हक्काला प्राधान्य, सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला सुनावले

संजय दिना पाटील शिंदेंच्या संपर्कात, हे उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, मनसेनच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय तपास संस्थेने ईशान्येकडील राज्यातील वांशिक हिंसाचाराच्या विविध प्रकरणांमधील १० आरोपींना अटक केली

SCROLL FOR NEXT