Parashuram Upkar criticizes the government
Parashuram Upkar criticizes the government 
कोकण

महाविकास आघाडी निष्क्रीय ः उपरकर

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केवळ आश्वासने देत आहे. वर्षपुर्ती होत असताना हे सरकार निष्क्रिय ठरले आहे. केवळ कोरोनाचे कारण पुढे करून जनतेचा भ्रमनिरास केल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. 

येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ""निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने जिल्ह्यातील शिवसेना लोकप्रतिनिधींनी दिली होती; परंतु जनतेला दिलेला शब्द त्यांनी पाळलेला नाही. कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा निष्क्रिय ठरली. जागोजागी जनतेची लुट या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.

शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा असो किंवा नुकसान भरपाई असो वीज बिलाबाबत ही ग्राहकांना कोणतीही सवलत मिळालेली नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. असे सरकार आणि मंत्री सांगत आहे; मात्र जनतेच्या पदरात काही पडत नाही. कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी आरोग्य यंत्रणेराहून मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारने या काळात भरणा केलेले आरोग्य कर्मचारी सध्या कमी केले जात आहेत. भविष्यात कोरोनाची दुसरी लाट आली तर असलेल्या आरोग्य यंत्रणा मोठा ताण येणार आहे. जे आरोग्य कर्मचारी आठ महिने जीवावर उध्दार होऊन कोरोना रुग्णांशी लढत होते. त्यांना गेल्या आठ महिन्यात वेतनही दिलेले नाही.'' 

लोकप्रतिनिधींकडून निराशा 
मच्छीमारांचे प्रश्‍न, कबुलायतदार गावकर, आकारीपड, वनसंज्ञा हे प्रश्न जैसे थे आहेत. जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्‍यात हत्तींमुळे मोठे नुकसान होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. हत्ती पार्क ही एक वेगळी गोष्ट आहे. एकूणच या घोषणा सरकारच्या कालावधीतील आहेत. जिल्ह्यातील जनतेने ज्या लोकप्रतिनिधींना अपेक्षेप्रमाणे निवडून दिले. त्या जनतेची या लोकप्रतिनिधींनी घोर निराशा केल्याची टीका उपरकर यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT