कोकण

देवघर-सोंडे ग्रामपंचायतीत पाऊस पाणी संकलन उपक्रम

CD

देवघर-सोंडे ग्रामपंचायतीत
पाऊस पाणी संकलन उपक्रम
खेड, ता. ९ः पावसाळ्यात मुबलक पाऊस पडूनही पाणी वाया जाते. पावसाचे पाणी अडवण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी शोषखड्ड्यांची खोदाई केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, असे देवघर सोंडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दीपक कदम यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. विकासकामे मार्गी लावताना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत ग्रामस्थांना त्यात सहभागी करून घेण्यामध्येही तितकाच भर दिला जात आहे. ग्रामस्थही ग्रामपंचायतीच्या उपक्रमांमध्ये हिरीरिने सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचमुळे ग्रामपंचायतीचाही हुरूप वाढत असून ग्रामस्थांसाठी अनेक हितकारक योजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे. देवघर-सोंडे येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ पोहचत नसली तरी पावसाच्या पाण्यातून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत पुढे सरसावली आहे. पावसाळ्यात प्रत्येक ग्रामस्थाच्या छपरावरील पडणारे पावसाचे पाणी संकलन करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामस्थांना शोषखड्डे खोदण्यास सांगण्यात आले. या खड्ड्यांमध्ये १ हजार लिटर पाणी जिरवले जाणार आहे. १० हजार लिटर पाण्याचे पुनर्भरण केले जाणार आहे. जमिनीत मुरवल्या जाणाऱ्या पाण्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून, या पाण्याचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT