कोकण

कणकवली, कसाल परिसरात जोराचा पाऊस

तुषार सावंत

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फुलोऱ्यावर आलेल्या काजू आणि आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात गैरमोसमी पावसाने हजेरी लावली होती. दक्षिणेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर दोन-चार दिवस होता.

गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पण आज पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस कोसळला. ढगाळ वातावरण, पहाटेची थंडी आणि अचानक आलेला पाऊस हे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांना धोक्याची घंटा आहे. हाता तोंडाशी येणारा आंबा काजू फुलोऱ्यावर येत असतानाच नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीवर ही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

खरीपातील भाताची कापणी करून जागोजागी गवत रचून ठेवले आहे मात्र अधून मधून पाऊस हजेरी लावत असल्याने या नैसर्गिक संकटाचा फटका गरीब शेतकऱ्याच्या पदरात पडणार आहे. आंबा-काजू बागायतदारांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.

दरम्यान आजच्या पावसामुळे सगळे रस्ते चिखलमय झाले. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली होती मात्र आज दुपारनंतर तापमानात वाढ झाली. सायंकाळी चारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी अचानक कोसळल्याने सगळ्यांची धांदल उडाली. दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने पाऊस पुढे सरकत होता. पावसाची रिप रिप बराच काळ सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT