कोकण

रत्नागिरीतील भारती शिपयार्डच्या गोडावूनला आग

राजेश कळंबटे

रत्नागिरी - भारती शिपयार्डच्या एमआयडीसीतील गोडावूनला मंगळवारी दुपारी मोठी आग लागली. गोडावून परिसरातील गवताला अज्ञाताने आग लावली होती. दुपारी सुटलेल्या वाऱ्यामुळे ही आग पसरली. कंपनीच्या गोडावूनमधील गवतापर्यंत ही आग पोहचली. अवघ्या काही सेकंदात गोडावूनमधील गवतासह सामानाने पेट घेतला. या आगीत गोडावूनमधील सामान जळून खाक झाल्याने अंदाजे ७० ते ८० लाखाचे नुकसान झाल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनी बंद अवस्थेत आहे. कंपनीला आवश्यक सामान या गोडावूनमध्ये जमा करून ठेवण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतील कंपनीच्या गोडावूनला आग लागली. या गोडावूनच्या परिसरात मोकळे फ्लॉट आहेत. या फ्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. गवत जाळण्यासाठी अज्ञाताने दुपारच्या सुमारास आग लावली होती. ती कंपाउंड मध्ये पसरली. आतील फायबरने तत्काळ पेट घेतल्याने सुमारे चार ते पाच विंच जळून खाक झाले. याशिवाय वायर रोप, इलेक्ट्रॉनिक केबल आदी सामानानेही पेट घेतला.

नगरपरिषदेचे पाच बंब आग आटोक्यात आणण्यासाठी आले होते. तब्बल दीड तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT