कोकण

लांजा तालुक्यात खानवली येथे वणव्यात आंबा बाग खाक..

अमोल कलये

रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या वणव्यांचे सत्र सुरुच आहे. रविवारी मंडणगड तालुक्यात एका घरासह दोन गोठे वणवण्यात जळून खाक झाले होते. ही घटना ताजी असताना आज लांजा तालुक्यातील खानवली गावात वणवा पेटला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की खानवली गावात लागलेल्या मोठ्या वणव्यात आंब्याची ४५० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जवळपास १६ एकर वरील कलमे यात जळून खाक झाली आहेत. दुदैवाची गौष्ट म्हणजे येत्या दोन दिवसात या आंब्याची तोड होणार होती. मात्र हे सर्व आंबा पिक जळून खाक झाले आहे. पेटलेला वणवा आोटक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. विशेष म्हणजे ज्यांची कलमाची बाग जळाली आहे ते सध्या परगावी आहेत. त्यांच्या बागेत असलेल्या नोकराने वणवा आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. डोळ्यासमोर आंब्याची कलमे जळून खाक झाल्याने त्याच्या ही डोळ्यात अश्रू तरळत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT