कोकण

राष्ट्रवादीला विजयाची हॅट्रीक साधण्याची संधी

मुझफ्फर खान

चिपळूण - कोकण पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव सुनील तटकरे यांनी घेतली आहे. 

कोकण मतदारसंघातील सर्वच निवडणुकांचा सुनील तटकरे यांना दांडगा अनुभव आहे. मुलगा अनिकेत, शिक्षक आमदार कपिल पाटील यांना निवडून आणून शिवसेना, भाजपची मक्तेदारी मोडून काढण्यात तटकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नजीब मुल्ला यांना विजयी करून विजयाची हॅट्रीक साधण्याची संधी तटकरे यांना आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस अगोदर विद्यमान आमदार डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी तिकीट मिळवले. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे ऐनवेळी नजीब मुल्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

मतदारसंघातील एकूण मतांपैकी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 60 टक्के मतदार आहे. पहिल्या पसंतीची मते मिळण्यासाठी मुल्ला व ठाणे, नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. उर्वरित 40 टक्के मतांपैकी सर्वाधिक मते मिळवण्याची जबाबदारी पक्षाचे महासचिव सुनील तटकरे यांनी घेतली आहे.

त्यांच्या मदतीला आमदार भास्कर जाधव, संजय कदम आणि माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकमही मैदानात उतरले आहेत. या तीन जिल्ह्यात 40 टक्के मतदार आहेत. यातील किती टक्के मतदान मुल्ला यांना होईल. आकड्यांची जुळवाजुळव करण्यात माहीर असलेले तटकरे कोकण पदवीधर मतदार संघासाठी कशी जुळवाजुळव करतात याकडे कोकणवासियांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT