कोकण

इन्सुली, झाराप भुयारी मार्गास 64 कोटी

CD

swt१६३१.jpg
८९५४४
इन्सुलीः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खामदेव नाका येथे याच ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित आहे. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

इन्सुली, झाराप भुयारी मार्गास ६४ कोटी
महामार्गावर प्रस्तावित ः राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली-खामदेव नाका व झाराप झिरो पॉईंट येथे दोन ठिकाणी प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गांसाठी एकूण ६४ कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पत मंजुरी देण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी यांनी ''सकाळ''ला दिली. राष्ट्रीय महामार्ग विभागाने यासाठी वर्षभरापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला होता.
इन्सुली येथे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित असून हे एक किलोमीटर लांबीचे आहेत. तर झाराप येथील भुयारी मार्ग हा दीड किलोमीटर लांबीचा आहे. बांदा बसस्थानक येथे ८० कोटी रुपये खर्चून ६०० मीटर लांबीचे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामाला देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. महामार्गावर सटमटवाडी येथे देखील २० कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग बनविण्यात येणार आहे. वरील नव्याने मंजूर केलेल्या दोन्ही कामांची ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
इन्सुली खामदेव नाका हा सातत्याने वर्दळीचा आहे. या ठिकाणी महामार्गावरून सावंतवाडी तसेच मडुरा, शेर्ले, आरोस येथे जाण्यासाठी रस्ते एकत्र येतात. त्यामुळे सातत्याने वाहनांची वर्दळ असते. बरेच छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावे, अशी मागणी तत्कालीन रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, मोहन गवस, वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. तसेच सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने उड्डाणपूल होण्यासाठी सर्वेक्षण देखील केले होते. तसेच प्रारूप आराखडा तयार करून अंतिम मंजुरीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. सर्वेक्षण केल्यानंतर या ठिकाणी उड्डाणपूल न उभारता भुयारी मार्गांना प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार या कामांचा प्रारूप आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पात या दोन्ही कामांना मंजुरी देण्यात आली असल्याने लवकरच या ठिकाणी कामांना प्रारंभ होणार आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत ई-निविदा प्रक्रिया राबवून दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे उपअभियंता खटी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT