कोकण

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला भारत सरकारची मान्यता

CD

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला मान्यता

अविनाश बरगजे ; संघटनेतील वादाचा खेळाडूंवर परिणाम

चिपळूण, ता. २० ः तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेला भारत सरकारने मान्यता दिली. यापुढे तायक्वांदो देशात अधिक गतिमान व पारदर्शक कार्यप्रणाली राबवणार असल्याची माहिती राज्य संघटना अध्यक्ष डॉ. अविनाश बरगजे यांनी दिली.
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व वालावलकर क्रीडासंकूल डेरवण आयोजित सबज्युनिअर स्पर्धा उद्घाटनप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देशपातळीवर क्रीडा संघटनामध्ये वाद निर्माण झाल्यास त्याचे परिणाम पालक आणि खेळाडू यांच्या मानसिकतेवर होत असतात. पडद्यामागे पदाधिकारी कायदेशीर संघर्ष करत असतात. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेला भारत सरकारने मान्यता दिली.
राष्ट्रीय संघटनेत सतत दहा वर्ष कोषाध्यक्ष राहिलेल्या विनायक गायकवाड यांचे निधन झाल्याने राज्य स्पर्धाप्रसंगी ५००हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक यांनी श्रद्धांजली अर्पण केली. फेडरेशन सदस्य मिलिंद पठारे यांनी राज्यात रत्नागिरी जिल्हा संघटना सन २००२ पासून आजपर्यंत शिस्तबद्ध जिल्हा संघटना म्हणून दिशादायक काम करत असल्याचे सांगितले. राज्य संघटनेत व्यंकटेशराव कररा यांचा अनुभव निर्णायक ठरल्याने त्यांची खजिनदारपदी निवड झाल्याचे स्पष्ट केले. या वेळी आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कारविजेते प्रवीण बोरसे, अजित घार्गे, सतीश खेमस्कर हे राज्य कार्यकारिणी, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, जिल्हा संघटनेचे मयूर खेतले, विश्वदास लोखंडे, शशांक घडशी, लक्ष्मण कररा, संजय सुर्वे या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली! नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

Jayanta Patil: सांगलीच्या अपक्ष उमेदवाराची मी शिफारस केलेली, मात्र... जयंत पाटलांचा मोठा खुलासा

IPL 2024 : पराभव विसरा, पुढच्या तयारीला लागा... कर्णधारने सहकाऱ्यांना दिला मोठा सल्ला

Malaria Vaccine : मलेरियाच्या विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन लस, जेएनयू विद्यापीठाचे संशोधन

Latest Marathi News Update: उजनी धरणात पडलेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले

SCROLL FOR NEXT