कोकण

आंबा संशोधन केंद्रासाठी रत्नागिरीत जागा शोध

CD

आंबा संशोधन केंद्रासाठी रत्नागिरीत जागा शोधा

कोकण आयुक्तांच्या सूचना ः आंबा बागायतदारांना दिलासा

रत्नागिरी, ता. २८ ः बदलत्या वातावरणाने गेली पाच वर्षे आंबा उत्पादनात सातत्याने घट होत आहे. यासाठी रत्नागिरीतील बागायतदरांसाठी आंब्यावर होणाऱ्‍या वातावरणातील बदलाचे परिणाम जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार खबरदारीचे उपाययोजना सुरू करण्यासाठी आंबा संशोधन केंद्राची मागणी बागायतदारांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद देताना कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली जागा निश्चितीच्या सूचना कोकण विभागीय आयुक्तांनी प्रशासनाला दिली.
आंबा उत्पादनाचे घटलेले प्रमाण हे चिंता वाढवणारे असल्याची कैफियत अलिकडेच बागायतदरांनी प्रशासनासमोर मांडली होती. याबाबत कारणमीमांसा होण्याबाबत ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणी सर्वच बागायतदारांनी लावून धरली होती. बागायतदारांच्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्‍यांनी लवकरच हापूस आंबा संशोधन केंद्र मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्‍यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन बागायतदारांना दिले होते. गेली चार-पाच वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच या परिसरात बागायतीमध्ये फळधारणेचे प्रमाण सातत्याने घटत असल्यामुळे येथील शेतकऱ्‍यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली. याबाबत कृषी खात्यासह पर्यावरण खात्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार या तक्रारीची दखल घेऊन कोकणातच प्राधान्याने रत्नगिरी जिल्ह्यात आंबा संशोधन केद्र सुरू करण्यासाठी कोकण कृषीविद्यापीठाचे मार्गदर्शन घेणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT