कोकण

रत्नागिरी-रत्नागिरीतील पाणी योजनेचे दुष्टचक्र सुरूच

CD

-rat१३p४.jpg-
37648
रत्नागिरी ः पालिकेच्या पाणी योजनेची पाईप जयस्तंभ येथे पुन्हा फुटली.

-rat१३p५.jpg
37649
रत्नागिरी ः वाया जाणाऱ्या पाण्यामुळे जयस्तंभ येथील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते.

००००

पाणी योजनेचे दुष्टचक्र सुरूच

सलग दुसऱ्या दिवशी पाईप फुटला; जयस्तंभ रस्त्यावर पाणीच पाणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : शहरात जिल्हा परिषदेपासून टाकण्यात आलेली पाणी योजनेची मुख्य पाईपलाईन पालिकेसमोर फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. या परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. हा प्रकार आज सलग दुसऱ्यावेळी घडल्यामुळे पाईपच्या दर्जाबाबत उपस्थित केले जाणारे आरोप खरे होतात की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
शहरातील जयस्तंभ येथे आज पुन्हा मुख्य पाईप फुटला. फुटलेल्या पाईपमधून सकाळी साडेसहा वाजल्यापासून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत होते. विशेष म्हणजे रत्नागिरी पालिका कार्यालयासमोर हा प्रकार घडूनही वाया जाणाऱ्या पाण्याकडे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लक्ष दिले गेले नाही.
कालच (ता. १२) पाण्याच्या टाकीतील पाण्याच्या अतिरिक्त पातळीचा पाईपवर काही परिणाम होतो का, याबाबत चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्येही पालिका यशस्वी झालेली नाही. पाण्याच्या जास्त दाबामुळे शासकीय रुग्णालयासमोरील पाईप फुटला. त्याची दुरुस्ती झाल्यानंतर आज पुन्हा नियमित दाबाने पाणी सोडण्यात आले; परंतु सकाळी पालिकेच्या समोरच पाईप फुटला. जिल्हा परिषदेपासून पालिकेच्या दिशेने टाकण्यात आलेल्या पाईपच्या दर्जाबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. वारंवार पाईप फुटूनही थातुरमातूर उत्तरे पालिकेचा पाणी विभाग देत आहे. जयस्तंभ येथे पाईप फुटल्याने जयस्तंभ परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. पालिकेची नवीन पाणी योजनेची पाईप दररोज फुटत असल्यामुळे त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होणार आहे. संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्याने वारंवार फुटणाऱ्या या पाईप सुमार दर्जाच्या असाव्यात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
----------
चौकट
ठेकेदाराचे बिल थांबवा ः कीर
सुधारित पाणी योजनेचा दर्जा काय आहे, हे आपल्याला वारंवार फुटणाऱ्या पाइपवरून लक्षात येत आहे. आपण आतातरी जागे झाले पाहिजे. नाहीतर भविष्यात आपल्याला हे भोगावे लागू नये, म्हणून पालिकेने ठेकेदाराचे बिले थांबविले पाहिजे. तरच चांगली योजना पालिकेच्या ताब्यात येईल. अन्यथा आयुष्यभर हे भोगावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिली.
---------
कोट
आम्ही वारंवार पाणी योजनेबाबत आक्षेप मांडले आहेत. जास्त दाबाने पाईप फुटत आहेत. दर्जेदार काम नसल्याने नागरिकांना हा त्रास कायमचा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या योजनेचे ऑडिट होणे गरजेचे आहे.
- नीलेश भोसले, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेवर भाजपला धक्का, शिंदेंच्या शिवसेनेचा विजय!

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

'मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर...' अपघातानंतर नोरा फतेहीची पहिली प्रतिक्रिया, आता कशी आहे तब्येत?

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

Navi Mumbai Crime: धावत्या लोकलमधून तरुणीला ढकलले, माथेफिरू व्यक्तीचे कृत्य; पनवेल स्थानकातील प्रकार

SCROLL FOR NEXT