कट्टा नाथ पै सेवांगणतर्फे
गांधी, शास्त्रींना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः अंहिसक स्वातंत्र्यलढा हे गांधीच्या स्वातंत्र्य लढयाचे वैशिष्ट्य आहे. आजही महात्मा गांधींना जगभरात आदराचे स्थान आहे. महात्मा गांधींनी १९२० ते १९४७ असा एकूण २७ वर्षे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करून अहिंसक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे प्रतिपादन दीपक भोगटे यांनी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, मनोज काळसेकर, विद्या चिंदरकर, रिया जांभवडेकर, बाळकृष्ण गोंधळी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी भोगटे यांनी, लालबहादूर शास्त्री हे गांधीवादी विचारवंत होते. त्यांचे सारे जीवन अत्यंत साधे राहिले. शास्त्री यांनी जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर भारताचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले. पाकिस्तान विरुद्धच्या १९६५ च्या लढ्यात त्यांनी कणखर भूमिका घेऊन भारतास स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या थोर नेत्यांची लोकशाहीवादी, समतावादी, अहिंसक विचार आणि साधी रहाणी सर्वानी अंगिकारावी, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.