कोकण

-वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज

CD

-rat७p२०.jpg-
२५N६२३६६
चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
----
वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज
स्वखर्चाने वाहतूक ; नागरिकांना मोफत गाळ घेऊन जाण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः वाशिष्ठी नदीतून दरवर्षी काढण्यात येणाऱ्या गाळाचे करायचे काय असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. त्यामुळे यावर्षी महसूल विभागाने नागरिकांना मोफत गाळ घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत ७० लोकांनी गाळ मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला आहे.
चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी नदीतील गाळ कारणीभूत असल्याचा आरोप नेहमी केला जातो. त्यामुळे २०२१ च्या महापुरापासून दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू होते. वाशिष्ठी नदीत गाळ उपसा केल्यास, नदीतील पाण्याच्या प्रवाहासाठी मदत होते आणि पूर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. गाळ उपसा केल्याने नदीच्या पात्राला खोली वाढते आणि त्यामुळे पाणी जास्त साठवू शकते, ज्यामुळे पूर येण्याची शक्यता कमी होते. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करणे आवश्यक आहे, उपसलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. जेणेकरून नदीतील गाळ पुन्हा साचणार नाही आणि नदीचा प्रवाह कायम राहील. दरवर्षी नदीतून गाळ काढला जातो.
मागील दोन वर्ष नदीतून काढण्यात आलेला गाळ शहरातील शासनाच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आला. त्यानंतर गाळ काढण्यासाठी ज्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला अशा जमीन मालकांच्या पाणथळ जागेत गाळ टाकून त्या जागेत भराव करण्यात आला. त्यानंतर गरजूंना त्यांच्या मागणीनुसार गाळ वाटप करण्यात आला. वाशिष्ठीतील गाळ देताना शासन नागरिकांकडून कोणतीही रॉयल्टी घेत नाही. ज्या ठिकाणी गाळ करण्याचे काम सुरू आहे तेथून नागरिकांनी स्वखर्चाने गाळ देण्याची मुभा शासनाने केली आहे.
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत चिपळूणला आले होते. त्यांनी गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रशासनाला सूचना करताना नागरिकांना मोफत गाळ देण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदारांनी नागरिकांना मोफत गाळ घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.
---
कोट
वाशिष्ठी नदीतील गाळ स्वखर्चाने घेऊन जाण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. आतापर्यंत ७० लोकांनी मागणी केली आहे. त्यांच्या अर्जाची चौकशी केली जाईल त्यानंतर गाळ नेण्यासाठी परवानगी दिली जाईल.
--प्रवीण लोकरे, तहसीलदार, चिपळूण
---
कोट
वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ८० हजार एम क्यूब गाळ करण्यात आला आहे.
--विपुल खोत, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT