जिल्ह्यातील सात धरणे ‘ओव्हर फ्लो’
२०८.४० दशलक्ष घनमीटर साठा ; पाणी टंचाईवर मात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः पूर्व मोसमी जोरदार पावसासह आलेल्या मोसमी पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्याला पाणीदार केले आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मे महिन्यातच चांगली वाढ झाली आहे. एकूण ६८ धरणांपैकी ७ धरणे १०० टक्के भरुन ओव्हर फ्लो झालीत २५ धरणे ५० टक्के पेक्षा जास्त भरली असून जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सध्या एकूण २०८. ४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा झाला आहे.
गेल्या अनेक वर्षात प्रथमच मे महिन्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अलिकडे जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली होती. पण मे महिन्यातील या पावसामुळे जिल्हावासियांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्ह्यातील दापोलीमधील सोंडेघर, सुकोंडी, पंचनदी, गुहागर धरण चिपळूणमधील फणसवाडी, मालघर तर रत्नागिरी तालुक्यातील शीळ धरण, लांजामधील इंदवटी धरण १०० टक्के भरली आहेत. मध्यम प्रकल्प असलेल्या नातूवाडी धरणात २८.४९ टक्के, गडनदी धरणात ६४.१७ टक्के अर्जुना धरणात ४३.५६ टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद २८ मे रोजीच्या पाणी पुरवठा विभागाच्या अहवालात नोंद करण्यात आली आहे. पावसाने बुधवारपासून जरी उसंत घेतली तरी गेल्या दहा दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने पाणलोट क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सध्या एकूण २०८.४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठी झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.