शेतकरी ओळखपत्रासाठी आवाहन
पावस, ता. १८ ः केंद्र सरकारच्या ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र असणे आता विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. या ओळखपत्राशिवाय शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. रत्नागिरी तालुक्यातील सर्व जमीनधारक शेतकऱ्यांनी त्वरित शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केले आहे.
हेगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी ओळखपत्रामुळे सरकारला शेतकऱ्यांची अचूक माहिती उपलब्ध होऊन त्यांना योग्य योजनांचा लाभ पोहोचवणे सोपे होणार आहे. विशेषतः, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हे ओळखपत्र नसेल त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही. या ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवाकेंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन हेगडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.