swt111.jpg
74408
तळवडेः बॅंक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
बंद एटीएममुळे
तळवडेत गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः मातोंड मार्गावर असलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या तळवडे शाखेचे स्थलांतर होऊन बाजारपेठेत नव्याने शाखा सुरू करण्यात आली. पूर्वीच्या जुन्या जागेत बॅंकसह एटीएमची सुविधा उपलब्ध होती; मात्र नवीन शाखेत एटीएम सुविधा अद्याप सुरू केली नसल्याने स्थानिक ग्राहकांची पैसे काढण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. त्यांना बॅंकेत स्लीप भरून रांगेत उभे राहून आपल्या हक्काचे पैसे काढावे लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाया जात आहेत.
सध्या ग्रामीण भागांत शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक खरेदी करण्यासाठी तत्काळ पैसे मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे एटीएम नसल्याने ग्राहक बँकेत गर्दी करतात आणि बँक कर्मचारीसुद्धा त्रस्त होतात. त्यामुळे लवकरात लवकर नव्या शाखेच्या परिसरात एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी आग्रही मागणी व्यापारी व ग्राहकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.