शिवसेनेकडून ५०० शेतकऱ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ : कृषी दिनाचे औचित्य साधून तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी पाच अशा तालुक्यातील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचा झाडाचे रोप, शाल, श्रीफळ भेट देवून विशेष सन्मान करण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी दिली.
तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने ग्रामपंचायतींमध्ये शेतकऱ्यांच्या करण्यात आलेल्या या विशेष सन्मान सोहळ्याला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, महिला आघाडीच्या शुभांगी डबरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सुनील गुरव, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अजित नारकर आदी उपस्थित होते. तालुका शिवसेनेच्या वतीने १०१ ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी पाच शेतकरी असे मिळून पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचा झाडाच्या रोपासह शाल, श्रीफळ देवून विशेष सन्मान, सत्कार करण्यात आल्याची माहिती नागले यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.