‘नवीन सेवा जोडणी’तून १६ कोटींची कामे
महावितरण कंपनी ; ९ हजार ८२१ ग्राहकांना जोडणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी : ता. १९ : महावितरणच्या ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेमुळे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर (कृषी वगळून) ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी आता विनाशुल्क मिळत आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांत तब्बल १६ कोटी १७ लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. यामधून रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातील ९ हजार ८२१ नवीन ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
''नवीन सेवा जोडणी'' योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ९.९९ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. जिल्ह्यातील ६ हजार ६४४ ग्राहकांना निर्धारित वेळेत वीजजोडणी मिळाली आहेत.
महावितरणकडून अर्जदारास परिपूर्ण अर्ज व आवश्यक शुल्क भरल्यानंतर वीजपुरवठा करण्यात येतो. विद्यमान वाहिन्यांचा विस्तार, नवीन वाहिनी उभारणी अथवा यंत्रणेची क्षमता वाढवणे अशा पायाभूत सुविधा आवश्यकतेनुसार ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेतून महावितरणकडून उभारल्या जातात जेणेकरून कोणताही अकृषक ग्राहक वीजसेवेस वंचित राहू नये. अकृषक ग्राहकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा महावितरणच्या खर्चाने ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेतून उभारल्या जातात. जर ग्राहकाला केवळ स्वत:च्या वापरासाठी समर्पित यंत्रणा हवी असेल तर ‘डेडिकेटेड डिस्ट्रिब्युशन फॅसिलिटी’ (डीडीएफ) योजनेअंतर्गत वीजजोडणीचा पर्याय उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.