कोकण

मालवण बाजारपेठेमध्ये मोकाट जनावरांचा त्रास

CD

swt267.jpg
87207
मालवण ः येथील बाजारपेठेत मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

मालवण बाजारपेठेमध्ये
मोकाट जनावरांचा त्रास
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : गणेश चतुर्थीनिमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. नगरपरिषदेने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख नियोजन केले असल्याचा दावा केला असला, तरी आठवडा बाजारात या दाव्याची पोलखोल झाली. बाजारपेठेत पसरलेला चिखल आणि मोकाट जनावरांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला, अशी टीका मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांनी केली आहे.
गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने आठवडा बाजारात आले होते. याच गर्दीत मोकाट जनावरे फिरत असल्याने महिला आणि भाजी विक्रेत्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. ही जनावरे बाजारात येणाऱ्या नागरिकांना धक्के मारत होती. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. बाजारात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरलेले होते. पालिकेने चिखल असलेल्या भागावर वाळू टाकण्याचे सौजन्यही दाखविले नाही, यामुळे नगरपरिषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रभू यांनी पालिकेच्या या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त केली आहे. प्रभारी मुख्याधिकारी यांनी स्वतः शहरात फिरून नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे होत नसल्यामुळे त्यांना शहराविषयी कोणतीही आस्था नसल्याचे दिसून येते, असे प्रभू यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

SCROLL FOR NEXT