कोकण

खासदार राणेंनी जागेवर सोडवल्या १०५ तक्रारी

CD

-rat३०p२४.jpg-
२५O०१४१८
रत्नागिरी ः जनता दरबारात तक्रादारांची कैफियत ऐकून घेताना खासदार नारायण राणे. सोबत अन्य अधिकारी व पदाधिकारी.
-----
दरबारात थेट तक्रार, तातडीचा तोडगा
खासदार राणेंनी सोडवल्या १०५ तक्रारी ; अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : आमच्या वहिवाटेचा रस्ता बंद केला आहे, मला कंपनीने तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकले, पोलिसांनी सहा महिने झाले चोरीप्रकरणाचा तपासच केलाच नाही, एमएसईबीने, बीएसएनएल कंपन्यांबाबत तक्रारी, साकव, वृद्धाश्रमाला निधी देण्यापासून ते अगदी मुलाला नोकरी देण्यापर्यंत १०५ तक्रारी खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात दाखल झाल्या. राणे यांनी संबंधित अधिकारी आणि विभागांना सूचना देत पंधरा दिवसात या तक्रारींवर निर्णय देण्याचे आदेश देत सर्व तक्रारी निकाली काढल्या.
जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील खासदार नारायण राणे यांचा हा तिसरा दरबार होता. या वेळी आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर आदी उपस्थित होते.
तक्रारदारांना टोकन नंबर देऊन त्यांना नंबराप्रमाणे बोलावून कैफियत मांडण्याची संधी दिली. रत्नागिरीबरोबरच लांजा, राजापूर व संगमेश्वर येथूनही अनेक अर्जदार आपल्या तक्रारी व समस्या घेऊन आले होते. पोलिसदलाबाबत लांजातील चोऱ्या, आरजू कंपनीबाबत तक्रारी आल्याने यावर दोषींना तातडीने अटक करा, अशा सूचना राणे यांनी पोलिसांना दिल्या. अशा घटनांबाबत कुणाचाही दबाव घेऊ नका, असेही स्पष्ट केले. एसटी विभागाशी संबंधित तीन ते चार अर्ज आल्याने त्यांनी विभाग नियंत्रकांना तातडीने बोलावून घेतले. एसटीतील बदली, २५ वर्ष होऊनही निवृत्ती वेतनातील फरक मिळत नसल्याने एका निवृत्त कर्मचाऱ्याने जनता दरबारात धाव घेतली होती. गेली पन्नास वर्ष सुरू असलेली रत्नागिरी-पणजी बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबतचे निवेदनही देण्यात आले.

चौकट
रिफायनरीबाबत लवकरच जनता दरबार
राजापूर-बारसू रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. तेथील माती परीक्षणही करण्यात आले; परंतु पुढे काय झाले, हे अद्याप कळलेले नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी संमतिपत्र दिले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्याशी यापूर्वी चर्चा झाली आहे. पुन्हा एकदा व्हावी, अशी मागणी विनायक कदम यांनी केली. यावर राणे म्हणाले, पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा करून स्थानिक आमदार किरण सामंत यांच्यासोबत आपण लवकरच तिथे जनता दरबार घेऊ.

चौकट
अधिकाऱ्यांनी कामांचा पाठपुरावा करावा
हा जनता दरबार जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय हेवेदावे आणू नयेत. दरबारापेक्षा इतरवेळी जरी कामं आणली तरी ती सोडवली जातील, असे सांगितले. आलेल्या समस्या, तक्रारी यांचा निपटारा पंधरा दिवसात काढला जाईल. त्यासाठी आपण स्वत: याचा पाठपुरावा करणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT