कोकण

ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता कायम

CD

खेडमध्ये ढगाळ वातावरण
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आता दोन दिवसांपासून पावसाला विराम मिळाला असला तरीही तालुकाभर आकाशात ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे पुन्हा कधीही पाऊस कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, हीच शेतकऱ्यांसाठी नवीन चिंता बनली आहे.
सध्या अनेक शेतकऱ्यांची भातपिके कापणीस तयार आहेत. काही ठिकाणी कापणी सुरू झाली असून, काही ठिकाणी भात वाळवण्याचे कामही सुरू आहे; मात्र वातावरणातील दमटपणा आणि ढगाळ हवामानामुळे वाळवण प्रक्रियेला अडथळा निर्माण होत आहे. जर पुन्हा पाऊस सुरू झाला तर आधीच कष्टाने उभे केलेले पीक पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आता आणखी थोडा पाऊस झाला तर उरलेले भातपीकदेखील ओले होईल आणि उत्पादनावर मोठा परिणाम होईल. काही ठिकाणी शेतकरी पीक वाचवण्यासाठी घाईघाईने कापणी करून शेतातून भात बाहेर काढत आहेत तर काही ठिकाणी जमिनी ओल्या असल्याने यंत्रसामग्री वापरणे कठीण ठरत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या कपाळावर पुन्हा आट्या उमटल्या आहेत.

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!

SCROLL FOR NEXT