कोकण

राजापुरात जलजीवन योजनेचा फज्जा

CD

rat29p35.jpg
14267
राजापूरः संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठकीमध्ये कोंडीवळेचे सरपंच रविकांत मटकर यांनी मार्गदर्शन केले.

राजापुरात जलजीवन योजनेचा फज्जा
कामे अर्धवट; आराखडेच तयार नाहीत, सरपंचांकडून तीव्र नाराजी
टंचाई आराखडा बैठक - लोगो
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ः गावोगावची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी धीम्या पद्धतीने सुरू आहे. पाच वर्ष झाली तरी काही गावांमध्ये नळपाणी योजनेची कामेच सुरू झालेली नाहीत. काही कामे निकृष्ट दर्जाची आहेत. स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी-अधिकारी आणि ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन प्रशासनाने जलजीवन मिशन योजनेच्या नळपाणी योजनांचे आराखडे तयार केले असते तर संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठक घ्यायची वेळ नसती, अशा शब्दामध्ये सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि कोंडीवळेचे सरपंच रविकांत मटकर यांनी प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले.
तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनासोबत सर्वांचाच सहभाग असणे गरजेचे आहे. तहसीलदार विकास गंबरे यांनी संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. जलजीवन मिशन योजनेच्या तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर स्थानिकांना विश्‍वासात घेऊन लवकरात लवकर जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचेही त्यांनी सूचित केले. बैठकीला गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी नीलेश जगताप, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पवार उपस्थित होते.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन योजनेतर्गंत सुरू असलेल्या नळपाणी योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा दिल्यानंतर, या योजनांची सद्यःस्थिती आणि त्या पूर्ण करण्यामध्ये येणार्‍या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कोंड्येतर्फे सौंदळच्या सरपंच तळवडेकर, गोवळचे सरपंच अभिजित कांबळे, शिळचे सरपंच अशोक पेडणेकर यांच्यासह अन्य सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी चर्चेमध्ये भाग घेत काही सूचना मांडल्या.

चौकट
योजना कार्यान्वित करण्याबाबत विचार व्हावा ः मटकर
नळपाणी योजनांचा गावनिहाय सविस्तर आढावा सभेत घेण्यात आला. त्या वेळी चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मटकर यांनी भाग घेत जलजीवन मिशन योजनेची कशा पद्धतीने कामे सुरू आहेत, याची सविस्तर माहिती दिली. एप्रिल-मे महिन्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने तात्पुरत्या उपाययोजनांवर चर्चा करण्याऐवजी जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनांची कामे वेळेमध्ये कशा पद्धतीने पूर्ण करून या नळपाणी योजनाचा कार्यान्वित करता येईल, याचा प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

चौकट
बक्षिसपत्रे नसल्यास प्रस्ताव नामंजूर
जुन्या नळपाणी योजनांची कामे करताना पाणी साठवण टाकी आणि पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधित जमीनमालकांची त्या वेळी केवळ संमतीपत्र घेण्यात आली होती. त्याच कामांच्या दुरूस्तीसाठी नवीन काम प्रस्तावित करताना संबंधित जमिनमालकांची बक्षिसपत्र आवश्यक असतात. तशी बक्षिसपत्र न दिल्यास प्रस्ताव नामंजूर केला जात असल्याबाबत रायपाटणचे सरपंच नीलेश चांदे यांनी सांगितले. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'

Rajgad Illegal Hunting : राजगड तालुक्यात चौशिंग्या हरिण शिकार प्रकरणी वनविभागाकडून चार जणांना अटक; आरोपींकडून हत्यारे व मांस जप्त!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT