कोकण

अडीच अक्षरे पत्रलेखन स्पर्धेची मुदतवाढ

CD

आदर्श व्यक्तिमत्त्वाला लिहा पत्र
‘अडीच अक्षर राष्ट्रीय पत्रलेखन’ ; स्पर्धेसाठी मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर अडीच अक्षर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. चालू वर्ष २०२५–२६ साठी ही स्पर्धा आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वास पत्र या विषयावर आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
स्पर्धेत रत्नागिरी विभागातून ३ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. कोणताही भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच कोणत्याही स्थानिक भाषेत पत्र लिहिण्याची मुभा देण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपले पत्र स्वहस्ताक्षरात लिहावे. केवळ आंतरदेशीय पत्र, पोस्टाचे किंवा साधे लखोटे (योग्य तिकिटांसह) यांचा वापर करावा. आंतरदेशीय पत्रासाठी ५०० शब्द तर ए–४ आकाराच्या कागदासाठी १ हजार शब्दमर्यादा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा १८ वर्षांखालील व वरील अशा दोन वयोगटांत तसेच आंतरदेशीय पत्र व लखोटा अशा प्रकारांत घेतली जाणार आहे.
स्पर्धकांनी आपल्या पत्रावर १ जानेवारी २०२५ला आपण १८ वर्षांखालील अथवा वरील गटात येतो, असा दाखला नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील पत्रे जवळच्या पोस्टऑफिसमधून टपालाने मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल कार्यालय, मुंबई -४००००१ या पत्त्यावर पाठवावीत. सर्कल स्तरावर प्रत्येक प्रकारात प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये, द्वितीय १० हजार रु. व तृतीय ५ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. सर्कल स्तरावरील निवडक तीन पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठवली जाणार असून, तेथेही अनुक्रमे ५० हजार, २५ हजार व १० हजार रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक अ. द. सरंगले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

शिक्षणाधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला; राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; रोहित शर्माचा मित्र कर्णधार, एकाच डावात १९ सिक्स मारणाराही फलंदाजही परतला

Asaduddin Owaisi:‘१५ मिनिटां’चा इतिहास आहे, १५ तारखेला पुन्हा इतिहास घडवा: खासदार असदुद्दीन ओवेसी; राजकारणात नवा अध्याय लिहा!

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती, कमळाला हाताचा आधार; शिवसेना शिंदे गट विरोधी बाकावर

SCROLL FOR NEXT