कोकण

मोबाईलचा वापर किती करावा हे खेळाडूंनी ठरवावे

CD

- rat२७p२०.jpg-
२६O२७५७४
डेरवण ः युथ गेम्सच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. चंद्रजित जाधव मार्गदर्शन करताना.

शिस्त अन् सरावातून यश मिळवा
डॉ. चंद्रजित जाधव ः ​डेरवण युथगेम्सचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ : आजच्या आधुनिक युगात मोबाइलविरहित समाजव्यवस्था होऊ शकत नाही, हे वास्तव आहे; मात्र, मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा, याचे भान प्रत्येक खेळाडूने ठेवणे आवश्यक आहे. शिस्त आणि सरावाच्या जोरावरच खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी केले.
डेरवण येथे आयोजित ‘डेरवण युथ गेम्स’च्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यंदा विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीसरूपाने देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या वेळी जाधव म्हणाले, केवळ सहभाग घेणे पुरेसे नसून खेळाडूंनी खेळामध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. शिस्त आणि सरावाच्या जोरावरच खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणून त्यांनी खेळाडूंनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. जंकफूड खाल्ल्यामुळे शरीरातील अनावश्यक कॅलरीज वाढतात, ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि शरीरयष्टीवर दिसून येतो. यामुळे मैदानावर खेळताना तुमची क्षमता कमी पडू शकते. जर तुम्हाला उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर सकस आहाराला प्राधान्य द्या, असे त्यांनी सांगितले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक कमलेश जोशी, रुग्णालय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, अजित गाळवणकर, संदीप तावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते.
----
अटीतटीच्या लढती
एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात ६ मार्चपर्यंत अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबलटेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या राज्याच्या विविध भागांतून खेळाडू, संघ डेरवण येथे दाखल होत आहेत. सुमारे सात हजार खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. संघांमधील अटीतटीच्या लढती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमीही येथे येऊ लागले आहेत.
----

महायुती सरकारचा मोठा निर्णय! आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्यांची थेट नियुक्ती होणार, समीकरणे बदलणार

Mumbai Water Project: बीएमसीच्या मोठ्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा मार्ग मोकळा, ४३७ कोटींचा नवा प्लॅन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : जालना जिल्हा प्रशासनाचा संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा तयार

GST Scam : 593 कोटींचा बनावट GST घोटाळा उघड; मुख्य सूत्रधार मोहम्मद सैफुल्लाच्या आवळल्या मुसक्या, DGGI च्या धाडीत बड्या रॅकेटचा असा झाला पर्दाफाश!

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

SCROLL FOR NEXT