‘जनशताब्दी’ला
विलवडेत थांबा द्या
राजापूर, ता. ६ ः कोकण रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन अशा दररोज धावणाऱ्या जनशताब्दी गाडीला विलवडे येथे थांबा मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोकणात रत्नागिरीनंतर मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई-विलवडे असा रोज प्रवास करत असतात; मात्र काही ठराविक गाड्याच या स्थानकात थांबतात. त्यामुळे या चाकरमान्यांना व्हाया प्रवास करत विलवडे स्थानक गाठावे लागते. परिणामी, घरी पोहोचेपर्यंत बराच वेळ वाया जातो. जनशताब्दी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शनदरम्यान रोज धावते. विलवडे स्थानकात ही गाडी थांबल्यास लांजा, राजापूर, वैभववाडी आणि शाहूवाडी (कोल्हापूर) अशा चार तालुक्यांतील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.