IND-vs-PAK
IND-vs-PAK 
क्रिकेट वर्ल्ड कप

पाकिस्तानचा संघ कायमच बढाया मारत असतो- विरेंद्र सेहवाग

विराज भागवत

भारताने आतापर्यंत पाचही वेळा पाकिस्तानला केलंय पराभूत

युएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी सुरू झाली. त्यातील काही सामने झाले असून २३ ऑक्टोबरपासून मूळ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी नेहमीप्रमाणे सर्वच स्तरावर चर्चा रंगली आहे. भारताचा संघ उत्तम की पाकिस्तानचा संघ भारी यावरून क्रिकेट जाणकार आपापली मतं व्यक्त करत आहेत. त्याच दरम्यान भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानवर खोचक शब्दात टीका केली आहे.

"पाकिस्तानच्या खेळाडूंकडून आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काही ना काही ऐकतो आहोत. बढाया मारण्याची त्यांची सवय नवीन नाही. ते कायमच मोठ्या मोठ्या बाता मारत असता. सामना ज्या दिवशी असतो त्याच्या किमान आठवडाभर आधी भरपूर चर्चा रंगते. पाकिस्तानच्या आजी माजी खेळाडूंकडून तर मुद्दामच चर्चा रंगवण्यात येते. भारतासमोर पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे ही चर्चा कायमच रंगतदार होते. पण सत्य हे आहे की पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करू शकलेलं नाही. त्यामुळे दर वेळी ते विजेतेपदाचा दावा करतात आणि त्यानुसार बढाया मारत असतात", असं विरेंद्र सेहवाग म्हणाला.

IND-vs-PAK

"सध्याचा दोन्ही संघांचा विचार केला आणि टी२० क्रिकेटचा विचार केला तर मला असं वाटतं की टी२० सामन्यातच भारताला जिंकण्याची जास्त संधी असते. कारण ५० षटकांच्या खेळात भारत कधीही पाकिस्तानला पराभूत करू शकलेलं नाही. टी२० फॉरमॅटमध्ये एखादा खेळाडू एकहाती सामना फिरवू शकतो. त्यामुळे ही संधी पाकिस्तानला केवळ टी२० मध्येच मिळू शकते", असं मत विरेंद्र सेहवागने व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT