Hyderabad Appoints Ambati Rayudu As Captain For Vijay Hazare Trophy 
क्रीडा

निवृत्ती मागे घेताच अंबाती रायुडू झाला हैदराबादचा कर्णधार

वृत्तसंस्था

हैदराबाद : भारताचा माजी फलंदाज अंबातू रायुडू याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय जाहीर करुन काहीच दिवस उलचले असताना हैदराबाद संघाने त्याला विजय हजारे करंडकासाठी कर्णधार म्हणून नेमले आहे. 

रायुडूने विश्वकरंडकात संधी न मिळाल्याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर मी भावनेत वाहत गेलो मला पुन्हा क्रिकेट खेळायचं आहे असं म्हणत त्याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

हैदराबादचा पहिला सामना 24 सप्टेंबरला कर्नाटकविरुद्ध होईल. रायुडूच्या नेतृत्वाखासी हैदराबाद त्यानंतर साखळी फेरीत गोवा, झारखंड, छत्तीसगड, सौराष्ट्र, मुंबई आणि केलळ यांच्याविरुद्ध खेळेल. हैदराबादचे सर्व सामने बंगळूरमध्ये होतील.

यानंतर रायुडूचे लक्ष भारतीय संघात पुनरागमन करण्याचे असेल मात्र, आता ते जवळपास अशक्य दिसत आहे. त्यामुळे किमान देशांतर्गत क्रिकेटमध्ये राहण्यासाठी तरी त्याला हैदराबादकडून चांगला खेळ करावा लागणार आहे. 

हैदराबादचा संघ : अंबाती रायुडू (कर्णधार), भावंका संदीप (उप कर्णधार), पी अक्षत रेड्डी, तन्मय अगरवाल, ठाकूर तिलक वर्मा, रोहित रायुडू, चामा मिलिंद, मेहदी हसन, साकेत साई राम, महंमद सिराज. मिकेल जैसवाल, जे मल्लिकार्जुन (यष्टीरक्षक), कार्तिकेय काक, टी रवी तेजा, अजय देव गौड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT