ind vs aus test matthew-hayden-criticizes 
क्रीडा

IND vs AUS: ‘कसोटी क्रिकेटला...' इंदूर खेळपट्टीवर दिग्गज खेळाडूंची जोरदार टीका

कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी १४ फलंदाज बाद अन्...

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून इंदूरच्या होळकर मैदानावर सुरू झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी १४ फलंदाज बाद झाले. सुरुवातीलाच हातभर चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी जोरदार टीका केली. अशा प्रकारची खेळपट्टी कसोटी क्रिकेटला मारक असल्याचे मत त्यांनी मांडले.

मातब्बर फलंदाज असलेल्या भारताचा पहिला डाव अवघ्या ३३ षटकांत १०९ वर संपल्यामुळे हेडन यांच्या टीकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑस्ट्रेलियासाठी विणण्यात आलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजच अडकले.

हेडन हे भारतात या मालिकेचे समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सहावे षटक फिरकी गोलंदाज टाकू शकतो म्हणजे खेळपट्टी कशा स्वरूपाची असेल, हे स्पष्ट होते. पहिल्या अर्ध्या तासात चेंडू वळत होता आणि खालीही रहात होता. त्यामुळे अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटीसाठी चांगल्या नाहीत, असे हेडन यांनी म्हटले आहे.

कसोटी सामना किमान चार दिवस तरी चालला पाहिजे; मात्र अशा प्रकारे जर झटपट विकेट जात राहिल्या, तर प्रेक्षकांबाबतही मला दुःख आहे. हा कसोटी सामना चार दिवस चालेल असे वाटत नाही, असे हेडन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

Sindkhed Raja Nagaradhyaksha Election : शरद पवारांचा २१ वर्षीय उमेदवार बनला नगराध्यक्ष, १५८ मतांनी विजयी; कोण आहे सौरभ तायडे?

Jalgaon Accident : जळगावात अपघातांचे सत्र! दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Navi Mumbai: नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा सुरू होणार; कधीपासून अन् तिकीट दर काय असणार? जाणून घ्या...

Nashik News: रुग्णालयातूनच रणनिती आखली, आजारी असूनही राजकारणावर पकड केली; उमेदवाराला जिंकवून भुजबळांनी ताकद दाखवली!

SCROLL FOR NEXT