Virat Kohli
Virat Kohli 
क्रीडा

भारतीय खेळाडूंत लढाऊ वृत्तीचा अभाव : गावसकर

यूएनआय

पुणे : भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाबद्दल भारतीय संघावर सडकून टीका केली आहे. 'आजपर्यंतचा हा सर्वांत मानहानिकारक पराभव असून, त्यांच्यात लढाऊवृत्तीचा अभाव होता,' असे त्यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण तीन दिवसही खेळू शकला नाही. एका वाहिनीला मुलाखत देताना गावसकर म्हणाले, ''भारतीय संघाची मायदेशात झालेली ही सर्वांत खराब कामगिरी म्हणता येईल. सलग 19 सामन्यांत अपराजित राहिल्यानंतरही भारतीय फलंदाजानी ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीचा सामना केला, ते बघून आश्‍चर्याचा धक्का बसला. हा एक वाईट दिवस असे म्हणता येईल. पण, भारतीय खेळाडूंनी अजिबात लढाऊवृत्ती दाखवली नाही, याचे अधिक आश्‍चर्य वाटते.'' 

खेळपट्टीवर थांबलो की धावा होतात, हे बेसिकच भारतीय फलंदाज विसरल्यासारखे वाटले, असे सांगून गावसकर म्हणाले, ''तिसऱ्या दिवशी चहापानानंतर अवघ्या अर्ध्या तासात भारताचा डाव संपला हे अविश्‍वसनीय होते. भारतीय खेळाडू बेफिकीर वाटले. खेळपट्टीवर थांबायलाच भारतीय फलंदाज विसरला होता.'' 

ऑस्ट्रेलियाचे स्मार्ट क्रिकेट 
सलग विजय मिळविणारा भारत विरुद्ध सलग पराभवाच्या गर्तेत अडकलेला ऑस्ट्रेलिया संघ असा हा सामना होता. घरच्या मैदानावर खेळताना साहजिकच भारताचे पारडे जड राहणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात वेगळेच घडले, असे सांगून गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाने 'स्मार्ट' खेळ केला.

ते म्हणाले, ''स्मिथची खेळी कर्णधाराच्या जबाबदारीला साजेशी अशीच होती. त्याची ही सर्वोत्तम शतकी खेळी ठरावी. लियॉन आणि ओकिफ यांनी भारतीय फलंदाजांच्या डोळ्यांत पाणी आणले.'' ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक करताना गावसकर यांनी त्यांच्या क्षेत्ररक्षणाला देखील दाद दिली. ते म्हणाले, ''पहिल्या कसोटीच्या विजयात क्षेत्ररक्षण हा मुद्दाही कळीचा ठरला. ऑस्ट्रेलियाने प्रत्येक झेल पकडला. पण, भारतीय खेळाडूंनी तब्बल पाच झेल सोडून त्यांना वर्चस्व राखण्यासाठी जणू मदतच केली.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT