rishabh pant AFP
क्रीडा

पंतचा पत्ता होणार कट? 'विराट' पराभवानंतर कोहलीची प्रतिक्रिया

इंग्लंड दौऱ्यातील आतापर्यंतच्या सामन्यात पंत अडखळत खेळताना दिसतोय.

सुशांत जाधव

लीड्सच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 76 धावा आणि डावाने पराभवाची नामुष्की ओढावली. तिसऱ्या डावातील पराभनवाचे मुख्य कारण हे भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी पहिल्या डावात केलेली खराब कामगिरी हेच होते. नावजलेल्या खेळाडूंच्या या यादित ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिमाखदार कामगिरीने हिरो ठरलेला रिषभ पंतच्या नावाचाही समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यातील आतापर्यंतच्या सामन्यात तो अडखळत खेळताना दिसतोय. तिसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात तो इंग्लंडच्या फिल्डर्संना कॅचिंग प्रॅक्टिस देत असल्याच्या तोऱ्यात आउट झाला. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियात मोठे बदल दिसू शकतात. यासह पंतला संधी मिळणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कोहलीने यावर भाष्यही केले आहे.

पंतसदर्भात नेमकं काय म्हणाला कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पुढील सामन्यात पंतला खेळवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कोहलीने पंतचे समर्थन केले. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात 23 वर्षीय पंतने नॉटिंघममध्ये 25, लॉर्ड्स 37 आणि 22 धावा आणि लीड्सच्या मैदानात 2 आणि 1 अशी धावसंख्या केली. आतापर्यंत त्याने केवळ 84 धावा काढल्या आहेत. त्यामुळेच त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवाला कोणी एकजण जबाबदार नाही.

एक टीम म्हणून आम्ही अपयशी ठरलोय. पुढील सामन्यातही रिषभ पंतला संधी निश्चितच मिळेल, असे कोहली व्हर्चुअल पत्रकार परिषदेत म्हणाला. यावेळी कोहलीने पुजाराची पाठराखणही केल्याचे पाहायला मिळाले. चेतेश्वर पुजारासंदर्भातही असेच बोलले जात आहे. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याची खेळी पाहून सर्व शांत झाले आहेत, असा टोलाही त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्यांना लगावला.

नेहमीच आकड्यावर खेळाडूंची क्षमता ठरवू नका

एखाद्या फलंदाजाने किती धावा केल्या त्याच्या आकडेवारीवरुन नेहमी त्याचे यश मोजले जात नाही. टीम म्हणून आम्ही तसा विचारही करत नाही. मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत. चुका सुधारून आम्ही पुन्हा दमदार खेळी करायला सज्ज आहोत, असेही कोहली यावेळी म्हणाला.

पुजाराचे कौतुक

पुजाराने तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 91 धावांची खेळी केली. त्याची ही खेळी टीम इंडियाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढण्यास पूरक ठरली नाही. पण कोहलीने पुजाराच्या खेळीवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला की, लोक काय बोलत आहेत याचा विचार न करता संघाच्या हितासाठी आवश्यक ते प्रयत्न पुजाराने केले, असे म्हणत कोहलीने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT