kiran-rijiju.jpg 
क्रीडा

टोकियोत भारत करणार सर्वोत्तम कामगिरी; क्रीडा मंत्र्यांचा विश्वास

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत आगामी टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेसाठी तगडा संघ पाठवेल आणि त्यांची कामगिरी आजपर्यंतची सर्वोत्तम असेल, असा विश्‍वास केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात व्यक्त केला. 

लोकसभेच प्रश्‍नोत्तराच्या सत्रात बोलताना रिजीजू म्हणाले,"विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आत्मविश्‍वास उंचावला आहे. अशाच सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाच तगडा संघ आम्ही ऑलिंपिकला पाठवणार आहोत.'' 

भारताला 2016 रियो ऑलिंपिक स्पर्धेत केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागले होते. रिजीजू म्हणाले,""गेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील कामगिरीचे आवलोकन करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्याकडून कामगिरीत सुधारणा करण्यासाठी चांगल्या सूचना आल्या आहेत. त्याचे परिणाम या ऑलिंपिकमध्ये निश्‍चित दिसून येतील. पदकाची खात्री असलेल्या खेळाडूंना ऑलिंपिकसाठी निवडले जाईल.'' 

"क्रीडा प्रसार आणि प्रचार ही राज्य सरकारांची जबाबदारी आहे. राज्यातील क्रीडा विकासात येणारे अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे." 
-किरेन रिजीजू, केंद्रिय क्रीडा मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT