Kapil Dev On World Cup 2023 Hype  esakal
क्रीडा

Kapil Dev On World Cup 2023 : अवास्तव स्तोम माजवू नका... वर्ल्डकपच्या हाईपवरून कपिलदेव यांनी सुनावले

सकाळ वृत्तसेवा

Kapil Dev On World Cup 2023 Hype

नवी दिल्ली, ता. २८ : अवास्तव स्तोम हा नेहमीच अपेक्षाभंग करत असतो. त्यासाठी समतोल साधणे आवश्यक असते, असा सल्ला माजी विश्वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी भारतीय प्रेक्षक तसेच सर्व प्रसिद्धी माध्यमांना दिला. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ पराभूत झाल्यामुळे झालेला हिरमोड यासंदर्भात कपिलदेव बोलत होते.

सर्व प्रेक्षकांनी अपेक्षांचे अतिदडपण खेळाडूंवर टाकू नये, क्रिकेट हा इतर खेळांप्रमाणे एक खेळ आहे, असे समजून त्याकडे पहावे, असे कपिल यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात, एवढ्या अपेक्षा ठेऊ नका की त्या पूर्ण झाल्या नाहीत तर हृदय तुटल्यासारखे जाणवत राहिल. इतर संघही आपल्याकडे विश्वकरंडक जिंकायला आले होते त्यामुळे आपण आपल्या संघासाठी अवास्तव स्तोम निर्माण करण्याची गरज नव्हती.

खेळाकडे खेळ म्हणूनच पहायला हवे. जो संघ त्या दिवशी (अंतिम सामना) सर्वोत्तम खेळ करेल त्याचा आदर ठेवायला हवा, निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर भारतीय प्रेक्षक फारच भावनावश होत असतो.

विश्वकरंडक स्पर्धेत सर्व दहा साखळी सामने जिंकल्यामुळे भारतीय संघच विश्वविजेता होणार अशी सर्वांची अपेक्षा होती आणि त्यामुळे कमालीचा स्तोम निर्माण करण्यात आला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने सर्व भारतीायांचा हिरमोड केला. हे केवळ या स्पर्धेपूरतेच मर्यादित नाही तर गेल्या दहा वर्षांत भारताने आयसीसीच्या विविध स्पर्धांतील बाद फेरीचे सात सामने गमावले आहे.

भारताने ही स्पर्धा जिंकली असती तर सर्वत्र उधाण आले असते, परंतु आपण अंतिम सामन्यात पराभूत झालो याचा अर्थ काही तरी कमी राहिले होते, ही कमतरता भरून काढली पाहिजे. सर्व साखळी सामने जिंकले म्हणजे आपल्याकडे कोणतीही कमतरता नव्हती असे नाही, असे कपिल यांनी स्पष्टपणे सांगितले. आपण काय गमावले यापेक्षा काय मिळवले याचा आनंद साजरा करायला हवा, असेही कपिल (Kapil Dev) म्हणाले.

आपल्या संघाने सर्व १० साखळी सामने हे विजेतेपदासाठी पुरेसे नव्हते ? आपण इतर संघांनी केलेली कामगिरीही लक्षात घ्यायला हवी तसेच आपली तुलना इतरांशीही करु नये. त्यांनी चांगला खेळ केला आहे की नाही हे पहावे. सपूर्ण स्पर्धेत आपण फारच चांगला खेळ केला, परंतु अंतिम सामन्याचा दिवस आपला नव्हता, असे मत कपिल यांनी मांडले.

कपिलदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या ड्रेसिंग रुमध्ये जाऊन खेळाडूंचे सांत्वन केले या घटनेचे कौतूक केले. पंतप्रधानांनी असे सांत्वन करायचे नाही तर कोणी करायचे. ते देशाचे प्रमुख आहेत. त्यांचा आधार मिळणे महत्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.

अपेक्षांचे दडपण किती असते याचा विचार आपण करू शकतो. परंतु खेळाडू हे दडपण सहन करत असतात. - कपिलदेव

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT