ranji trophy  sakal
क्रीडा

Ranji Trophy Final: मध्यप्रदेशविरुद्ध मुंबईचे फलंदाज चमकले, पहिल्या दिवशी 248/5

41 वेळच्या चॅम्पियन मुंबईने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Kiran Mahanavar

रणजी ट्रॉफी 2021-22 हंगामाचा अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचा संघ 88 वर्षांत दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 23 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशच्या संघाला कर्नाटककडून पराभव स्वीकारावा लागला होता. रणजी ट्रॉफी फायनलच्या पहिल्या दिवशी मुंबईने 5 गड्यांच्या मोबदल्यात 248 धावा केल्या आहेत.

मुंबईकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 78 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार पृथ्वी शॉने 47 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईचा सरफराज खान 40 आणि शम्स मुलानी 12 धावा करून खेळत आहेत. मध्य प्रदेशकडून सर्शन जैन आणि अनुभव अग्रवाल यांनी प्रत्येकी दोन तर सर्शन जैनने एक गडी बाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेल्वे गाड्यांना उशीर, परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक; रेल्वेची तोडफोड, IGसह पोलीस जखमी

IND vs AFG: थांबा आईचा कॉल येतोय... नितीश रेड्डीचा पत्रकार परिषद सुरू असतानाच वाजला फोन अन् मग...; पाहा Video

Gurupushyamrit Yoga Significance : गुरुपुष्यामृत योगातून त्रिवेणी संगमाच्या आध्यात्मिक अर्थाचा उलगडा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जून 2026

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ जून २०२६ ते २० जून २०२६)

SCROLL FOR NEXT