rumeli dhar
rumeli dhar 
क्रीडा

मिताली नंतर आणखी एका प्रसिद्ध महिला क्रिकेपटूकडून निवृत्तीची घोषणा

Kiran Mahanavar

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजनंतर आता रुमेली धरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रुमेलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहे. तिच्या या पोस्टमधून 15 वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा केले आहे. धरने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. रुमेली धरने भारतासाठी चार कसोटी, 78 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत रुमेली धरने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती देताना इंस्टाग्रामवर रुमेली धरने लिहिले की, पश्चिम बंगालमधून सुरू झालेला माझा २३ वर्षांचा क्रिकेट प्रवास अखेर संपला. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणे आणि 2005 च्या अंतिम फेरीत पोहोचणे माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय होते. बीसीसीआय आणि सहकारी खेळाडूंनी केलेल्या सहकार्याबद्दल मी या संधीचे आभार मानत आहे.

धरने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या तिरंगी T20 मालिकेत खेळला होता. रुमेलीने कसोटी क्रिकेटमध्ये 29.50 च्या सरासरीने 236 धावा केल्या आणि 21.75 च्या सरासरीने आठ विकेट घेतल्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 19.61 च्या सरासरीने सहा अर्धशतकांसह 961 धावा केल्या. याशिवाय त्याने 27.38 च्या सरासरीने 63 विकेट्स घेतल्या. रुमेलीने 18.71 च्या वेळेत 131 धावा केल्या आणि 23.30 च्या वेगाने 13 विकेट घेतल्या आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाबाद 66 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT