Hockey
Hockey 
क्रीडा

चौदा कॉर्नर दवडत भारताची हार

सकाळवृत्तसेवा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जिंकून हॉकीतील अंतिम यशाचा माउंट एव्हरेस्ट जिंकण्यास सुरवात होईल, असे भारतीय महिला हॉकी संघ सांगत होता, प्रत्यक्षात राष्ट्रकुल क्रीडा हॉकी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत दुबळ्या वेल्सविरुद्ध २-३ अशी हार पत्करली. तब्बल चौदा पेनल्टी कॉर्नर दवडल्याचा फटका भारतास बसला.

भारताचा माजी कर्णधार वीरेन रस्किन्हा यांच्या मते संघ मैदानात उतरला, त्या वेळीच त्यांच्यात आत्मविश्‍वासाचा अभाव जाणवत होता. लढत संपेपर्यंत तो उंचावल्याचे जाणवले नाही. जागतिक क्रमवारीत २६वे असलेल्या वेल्सने आक्रमक सुरवात करीत सातव्याच मिनिटास खाते उघडले. भारताची सदोष नेमबाजी, विस्कळित बचाव, त्यांचा गोलरक्षिका सविताबरोबर नसलेला सुसंवाद याचबरोबर बचावफळी आणि मध्यरक्षकात नसलेल्या समन्वयाचा भारतास फटका बसला. 

पहिल्या दोन सत्रांत दोन गोल स्वीकारल्यानंतर राणीने तिसऱ्या सत्रात सात मिनिटांच्या अंतराने गोल केले खरे; पण या सत्रात भारताने आठ पेनल्टी कॉर्नर दवडले. भारताने संपूर्ण सामन्यात १५ पेनल्टी कॉर्नर मिळवले; पण त्यापैकी एकावरच गोल केला. आधुनिक हॉकीत ड्‌ग्रॅ फ्लिकर लढतीचा निर्णय करतात. रामपाल आणि गुरजित कौर यात अपयशीच ठरल्या. पेनल्टी कॉर्नरवर जमिनीलगत ताकदवान हिट मारण्याव्यक्तिरिक्त क्वचितच वेगळे प्रयोग दिसले. आता त्यातही पूनम राणीने व्हॅरिएशनवर केलेला गोल वेल्सने टीव्ही पंचांची मदत घेत नाकारण्यात यश मिळविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT