क्रीडा

कोहलीने केले भारत-पाक सामन्यावर मोठे वक्तव्य

वृत्तसंस्था

 वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरंडकामध्ये सामना खेळवला जाणार का यावर सध्या मैदानाबाहेर युद्ध सुरु आहे. काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात विश्‍वकरंडकात होणाऱ्या सामना रद्द करावा अशी मागणी राजकारणी आणि माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. अशातच भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील खेळाडूंच्या पाकिस्तानविरु्ध सामना खेळण्याबाबात भावना स्पष्ट केल्या आहेत. 

विराट कोहलीनेही भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याप्रमाणेच याबाबत केवळ बीसीसीआय आणि सरकारचे आदेश मानणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. संघातील प्रत्येक खेळाडू देशासोबत असल्याने आता बीसीसीआय आणि सरकारनेच निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले आहे. 

येत्या 27 फेब्रुवारीला  दुबई येथील आयसीसीच्या मुख्य कार्यालयात पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात बैठक होईल. या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे भवितव्य ठरवले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT