skin care sakal
लाइफस्टाइल

Skin Care : फ्रुट फेशियल करताय? मग चुकूनही करू नका 'या' चार चुका, त्वचा होईल खराब

बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे फेशियल किट मिळतील, पण फ्रुट फेशियल करणे खूप चांगले मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा जेव्हा सुंदर आणि चमकणारी त्वचा हवी असते तेव्हा त्यासाठी काही अतिरिक्त पावले उचलणे अत्यंत आवश्यक असते. सीटीएम रूटीनचे दररोज पालन केले जाते, परंतु याशिवाय, फेशियल करणे देखील चांगले आहे. यामुळे तुमच्या त्वचेला अतिरिक्त पोषण मिळते.

बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे फेशियल किट मिळतील, पण फ्रुट फेशियल करणे खूप चांगले मानले जाते. यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारचे रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता कमी होते आणि तुमची त्वचा देखील चमकू लागते.

फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याशिवाय फळे निरोगी त्वचेसाठीही वापरले जाऊ शकतात. यामुळे काळे डाग वगैरेही कमी होतात. फ्रुट फेशियलचे अनेक फायदे आहेत, पण हे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे फेशियल करणे गरजेचे आहे. तर, आज आम्ही तुम्हाला फ्रूट फेशियल करताना कोणत्या चुका करू नये हे सांगणार आहोत.

त्वचेच्या प्रकारानुसार फ्रूट फेशियल न करणे

फळे त्वचेसाठी खूप चांगली मानली जातात हे खरे आहे, पण तुम्ही फेशियलसाठी कोणत्या प्रकारची फळे वापरत आहात याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही लिंबू किंवा संत्रीचा फेशियल ट्राय करू शकता. त्याचप्रमाणे, जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही पपईचा फेशियल करा.

त्वचा योग्य प्रकारे साफ न करणे

बहुतेक लोकांना असे वाटते की फेशियल केल्याने त्यांची त्वचा साफ होईल, म्हणून ते प्रथम चेहरा साफ करण्याकडे लक्ष देत नाहीत. तुमची त्वचा स्वच्छ करूनच तुम्ही फ्रूट फेशियल सुरू करा.

पॅच टेस्ट न करणे

जर तुम्ही पहिल्यांदाच फ्रूट फेशियल करत असाल किंवा पहिल्यांदाच कोणत्याही फळाला तुमच्या चेहऱ्याचा भाग बनवत असाल, तर संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी होत असेल तर ते फळ वापरणे टाळा.

फेशियल चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवणे

फ्रूट फेशियल चेहऱ्यावर जितके जास्त वेळ ठेवाल , तितका फायदा मिळेल, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही त्यांना फक्त 10-15 मिनिटे ठेवले पाहिजे. जर तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवाल तर त्वचा खराब होईल.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT