husband wife in indian society sakal
लाइफस्टाइल

बायकांनो नवऱ्याच्या आज्ञेचं पालन करता का? सर्व्हे काय सांगतो...

भारतीय कौटुंबिक व्यवस्थेतील स्त्रियांचं स्थान काय, यावर प्रकाश टाकणारा एक सर्व्हे नुकताच प्रकाशित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात कुटूंबसंस्थेला विशेष महत्त्व आहे. भारतातील कौटूंबिक जीवनातील लिंग भूमिकांवर प्रकाश टाकणारे एक सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये भारतीय कौटुंबिक जीवनात वारशापासून ते अंतिम संस्कारापर्यंत पारंपारिक लिंग भूमिकांना पसंती दिली जाते हे समोर आलं आहे.

भारतातील 10 पैकी नऊ भारतीय पत्नीने नेहमी आपल्या पतीची आज्ञा पाळली पाहिजे या कल्पनेशी सहमत आहे, ताज्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणातून (Pew Research Center survey) समोर आले आहे, भारतीय लोक कुटुंब आणि समाजात लिंग भूमिकेकडे कसे पाहतात याचा अभ्यास या सर्वेक्षणात केला गेला आहे. 29,999 लोकांपैकी जवळपास दोन तृतीयांश लोक या भावनेशी पूर्णपणे सहमत आहेत.हे सर्वेक्षण 2019-2020 च्या उत्तरार्धात कोरोना येण्यापूर्वी केले गेले. हा सर्व्हे बुधवारी, 2 मार्च रोजी प्रसिद्ध झाले. (Study: 9 Out of 10 Agree that Wife Must Obey Husband)

भारतीय लोक महिलांना राजकीय नेते म्हणून स्वीकारतात, परंतु कौटुंबिक जीवनात मात्र पारंपारिक लिंग भूमिकांना पसंती दिली जाते. सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की भारतीय स्त्रिया पुरुषांप्रमाणे विचार व्यक्त करत नाहीत.

कुटुंब व्यवस्थेत महिलांचं स्थान-

भारतीय स्त्रियांनी नेहमी पुरुषांची आज्ञा पाळायला हवी, या मताशी मोठ्या प्रमाणात स्त्रियाही सहमत असल्याचे दिसून आले आहे. परंतु हे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्यांपैकी खूप कमी भारतीयांना पत्नी पतींचे पालन केले पाहिजे असं वाटत नाही. परंतु ही संख्या फारच कमी आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मुलांची काळजी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र 62 टक्के लोक महिला आणि पुरुष दोघांनीही जबाबदार असले पाहिजे असे सांगतात. जवळपास 30,000 पैकी किमान 10,000 (34 टक्के) लोकांना असे वाटले की, बाल संगोपन ही स्त्रीची जबाबदारी आहे.

पैसे घरी कोण आणतात?-

54 टक्के भारतीयांना असं वाटतं की, पती आणि पत्नी दोघांनीही पैसे कमावण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे वाटते. परंतु 43 टक्के लोक ही जबाबदारी पुरुषांची आहे, असं मानतात. नोकऱ्यांच्या कमतरतेचे उदाहरण पाहता, महिलांपेक्षा पुरुषांना नोकरीसाठी अधिक अधिकार असायला हवा असे लोकांना वाटते. आरटीआय इंटरनॅशनलने प्यू रिसर्चसाठी केलेल्या 29,999 सर्वेक्षणांपैकी - 10 पैकी आठ लोक पुरुषांना नोकऱ्यांवर अधिक अधिकार असायला हवेत या मताशी सहमत आहेत.

मुलाला अधिक पसंती-

अंतिम संस्कार ते वारसा - बहुतेक भारतीयांना असं वाटतं की, मुले आणि मुली दोघांनाही पालकांकडून वारसा हक्क मिळायला हवा (64 टक्के) आणि आई-वडिलांच्या वयानुसार (58 टक्के) त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यायला हवी आहे. परंतु 10 पैकी चार भारतीय प्रौढ म्हणतात की वृद्ध पालकांची काळजी घेण्याची प्राथमिक जबाबदारी मुलांवर असली पाहिजे, तर मुलींबद्दल फक्त 2 टक्के असे म्हणतात. तब्बल 63 टक्के भारतीय पालकांना अंतिम संस्कारासाठी आणि दफनविधीसाठी प्रामुख्याने मुलांना जबाबदार असल्याचे पाहतात. त्यामागे ऐतिहासिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे देखील आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात जन्मलेल्या प्रत्येक 100 मुलींमागे 111 मुले होती. अलीकडील अभ्यास दर्शवितो की हे संकुचित होत आहे, परंतु आजही बेकायदेशीर लिंगनिदान चाचणी करून गर्भपात होत आहेत. लिंग गुणोत्तर हा देशामध्ये एक प्रमुख चिंतेचा विषय आहे.

धार्मिक अल्पसंख्यांकांपेक्षा महिलांशी भेदभाव केला जातो सर्वेक्षण केलेल्यांपैकी 23 टक्के लोक म्हणतात की, देशातील सुमारे एक चतुर्थांश भारतीय महिलांच्या बाबतीत खूप भेदभाव करतात. हे प्रमाण धार्मिक गट किंवा जातीपातींच्या भेदभावापेक्षा जास्त आहे. महिलांवरील हिंसाचार ही प्रमुख राष्ट्रीय समस्या असल्याचं अनेक लोकांना आढळते. जातीय हिंसा आणि भ्रष्टाचार ही खूप मोठी समस्या आहे (६५ टक्के आणि ७६ टक्के). सर्वेक्षणातून असेही समोर आले आहे की भारतीयांचे म्हणणे आहे की स्त्रिया आणि पुरुष दोघेही चांगले राजकीय नेते बनतात आणि 10 पैकी एकापेक्षा अधिक लोकांना असे वाटते की स्त्रिया सामान्यतः पुरुषांपेक्षा चांगल्या राजकीय नेत्या बनतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना समन्स बजावले, हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Shirpur Election : काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपमय! अमरीशभाई पटेलांच्या नेतृत्वाखालील भाजप स्वबळावर ठाम

Latest Marathi News Live Update : वंदे मातरम हे भारताचे एक पवित्र गीत आहे - हर्षवर्धन सपकाळ

Ranji Trophy 4th Round: मुंबईची दणक्यात सुरुवात, मुशीर खान, सिद्धेश लाडची शतकं; महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या अडीचशे धावा पार

Thane News: तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू, ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा; प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT