Sad People
Sad People esakal
लाइफस्टाइल

Sad People : या प्रकारच्या नोकऱ्या करणारे लोक असतात सर्वाधिक दु:खी, कारण...वाचा काय सांगते स्टडी

साक्षी राऊत

Sad People : नोकरीत विशिष्ट भूमिकेत असणारी माणसे आयुष्यात सर्वाधिक दु:खी असू शकतात. असे रॉबर्ट वॉल्डिंगर, एमडी, हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसोपचाराचे प्राध्यापक आणि हार्वर्ड स्टडी ऑफ अॅडल्ट डेव्हलपमेंटचे संचालक म्हणाले. ही माहिती 5-10 नाही तर तब्बल 85 वर्षांच्या अभ्यासाच्या आधारे सांगण्यात आली आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

ज्या नोकऱ्यांमध्ये कमी मानवी परस्परसंवादाची आवश्यकता असते अशा ठिकाणी सहकर्मचाऱ्यांबरोबर अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्याची संधी मिळत नाही. आणि अशा नोकऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था फार दयनीय असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

1938 पासून, हार्वर्डच्या संशोधकांनी जगभरातील 700 हून अधिक सहभागींकडून आरोग्य नोंदी गोळा केल्या आहेत आणि दर दोन वर्षांनी त्यांना त्यांच्या जीवनाबद्दल तपशीलवार प्रश्न विचारले आहेत.

या अभ्यासातून अशीही माहिती पुढे आलीय की, आनंदी, निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पैसा, व्यावसायिक यश, व्यायाम किंवा निरोगी आहार एवढे पुरेसे नाही तर सकारात्मक नातेसंबंध हे लोकांना आयुष्यभर आनंदी ठेवतात.

यावर शास्त्रज्ञ वाल्डिंगर म्हणतात, हे खरं तर प्रत्येकाच्या नोकरीच्या ठिकाणी गरजेचे आहे. "ही एक गंभीर सामाजिक गरज आहे जी आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये पूर्ण केली पाहिजे," वाल्डिंगर पुढे म्हणतात "तसेच, जर तुम्ही लोकांशी अधिक जोडलेले असाल, तर तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल अधिक समाधानी वाटते आणि चांगले काम करता येईल." (Employees)

कामाच्या ठिकाणी एकटेपणा वाटणे ही समस्या हल्ली सामान्य झालाय

काही सर्वात वेगळ्या नोकऱ्यांमध्ये परस्पर संबंधांपेक्षा अधिक महत्व हे कामाला असते. जसे की ट्रक ड्रायव्हिंग आणि रात्रीची सुरक्षा यासारख्या कामाला रात्रीच्या शिफ्टची आवश्यकता असते.

पॅकेज आणि फूड डिलिव्हरी सेवांसह तंत्रज्ञान-चालित उद्योगांमध्ये एकाकी नोकर्‍या सामान्य आहेत, जिथे सहसा कोणतेही सहकारी सोबत नसतात, किंवा ऑनलाइन रिटेल, जिथे काम "इतके जलद आणि कंटाळवाणे" असते की त्याच वेअरहाऊसवरील कर्मचारी शिफ्टमध्ये काम करत असूनही कदाचित एकमेकांची नावेही त्यांना माहीती नसतात, वॉल्डिंगर म्हणतात.

एकाकीपणाचा त्रास फक्त एकाकी नोकर्‍यांमधेच होत नाही तर चांगल्या नोकरीच्या ठिकाणी असलेले लोक देखील इतरांशी सकारात्मक, अर्थपूर्ण संवाद साधत नसल्यास एकटे पडू शकतात.

तेव्हा कामाच्या ठिकाणी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असतील तर तुम्ही कामात अॅक्टिव्ह असता आणि तुम्हाला स्ट्रेसही कमी येतो. तेव्हा कायम आनंदी राहाण्यासाठी कामाच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे फार महत्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT