Lok Sabha election 2024  Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

‘‘गेल्या काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. टपालाने आलेली मते ही निकालात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करीत असताना सर्वप्रथम टपालाने आलेल्या मतांची (पोस्टल बॅलेट्स) मोजणी केली जावी,’’ अशी मागणी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निवडणूक आयोगाकडे केली. आघाडीच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.

‘‘गेल्या काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. टपालाने आलेली मते ही निकालात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे ‘पोस्टल बॅलेट’ची सर्वप्रथम मोजणी केली जावी, हा निवडणूक आयोगाचा नियम होता.

त्यामुळे चार तारखेला निकालादरम्यान या मतांची आधी मोजणी केली जावी,’’ अशी मागणी करण्यात आल्याचे काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. कडक देखरेखीखाली मतमोजणी करावी, असा मुद्दा आयोगासमोर मांडण्यात आला असल्याचे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांना नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Sangli ZP Mahayuti : 'झेडपी'त सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करू, चंद्रकांतदादांची भूमिका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला प्रस्ताव

Gadhinglaj Panchayat : पक्षांपेक्षा गाव जिंकले! गडहिंग्लजमध्ये ‘आमचा गाव, आमचा उमेदवार’च्या लाटेत अनेकांचा दणदणीत विजय

Ajit Pawar work documentation : अजित पवार यांच्या कार्याचा समृध्द दस्तऐवज तयार होणार, ३५ वर्षातील कार्याला उलगडा होणार

Latest Marathi News Live Update : वर्धा-तुळजापूर दरम्यान जीटी एक्सप्रेसला भीषण आग

SCROLL FOR NEXT